विश्वविजेत्या दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेटपटू मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी

मुंबई : दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय साजरा करताना, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संघातील खेळाडूंसोबत संवाद साधला आणि त्यांच्या यशाचे कौतुक केले.


कोलंबोत नुकत्याच पार पडलेल्या 'फर्स्ट वुमेन्स टी२० वर्ल्ड कप क्रिकेट फॉर द ब्लाइंड २०२५'च्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा सात गडी राखून पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. हा दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिलाच टी-२० विश्वचषक होता आणि त्याचा मान भारताने मिळवला. या विश्वविजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी संघातील सदस्यांनी अनेक आव्हानांवर मात केली आहे. संघातील अनेक खेळाडू लहान खेड्यांतील, शेतकरी कुटुंबातील किंवा छोट्या शहरांतील वसतिगृहांतील आहेत. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.


महाराष्ट्राच्या गंगा कदम यांना या संघाचे उपकर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. नऊ भावंडांच्या शेतकरी कुटुंबातील गंगा लहानपणापासून दृष्टिहीन आहे. भविष्याचा विचार करून तिच्या वडिलांनी तिला अंधांसाठीच्या विशेष शाळेत दाखल केले. तिथे सुरुवातीला गंमत म्हणून क्रिकेट खेळायला लागली. आवाजाच्या आधारावर चेंडूचा माग काढणे, वेळेचा अंदाज घेणे अशी अनेक आव्हाने होती. मात्र २६ वर्षीय गंगाने चिकाटीनं सराव करत हे कौशल्य आत्मसात केले. मुख्यमंत्र्यांनी तिचे विशेष कौतुक केले.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य