महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान

मुंबई (हिं.स.) : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे राज्यभरात सुमारे ८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये वर्धा येथे १.३० लाख हेक्टर आणि नांदेडमध्ये ३ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.


राज्यात मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ८ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर सुमारे ४ हजार हेक्टर जमिन खरडली गेली आहे. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नांदेड, हिंगोली, बुलढाण्यात आदी जिल्ह्यांत अतिवृष्टी व त्यानंतर उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.


यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांची मोठी नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढला आहे. नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बसला असून, तेथील २ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन व फळपिकांचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यांत १ लाख ३१ हजार तर यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहे.


यासोबतच चंद्रपुरात ५५ हजार हेक्टर, नागपूरमध्ये ३३ हजार हेक्टर, भंडाऱ्यात १९ हजार हेक्टर, गडचिरोलीत १३ हजार हेक्टर, बुलढाण्यात ७ हजार हेक्टर, अकोल्यात ७२ हजार हेक्टर, अमरावतीत २७ हजार हेक्टर, हिंगोलीत १६ हजार हेक्टर, पुणे जिल्ह्यात तीन हजार हेक्टर, धुळे दोन हजार हेक्टर, नाशिक दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहे. नांदेडमध्ये सर्वाधिक १४२९ हेक्टर तर अमरावतीत १२४१ हेक्टर जमीन खरडली गेली आहे. अकोल्यात ४४१ हेक्टर, नागपूरमध्ये ३२१ हेक्टर, अहमदनगरमध्ये १७६ हेक्टर, यवतमाळमध्ये १४२ हेक्टर, पुण्यात १७६ हेक्टर, नंदुरबारमध्ये २७ हेक्टर, ठाण्यात १४ हेक्टर, रायगडमध्ये दोन हेक्टर अशी एकूण सुमारे ४ हजार हेक्टरच्या घरात जमीन खरवडून गेली आहे.

Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत