जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था उत्तम

मुंबई : जगातील गंभीर आर्थिक परिस्थितीच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. बँक ऑफ बडोदाच्या वार्षिक बँकिंग परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.


यावेळी रुपयाच्या घसरणीबाबत दास यांनी सांगितले की, रुपयामध्ये तीव्र चढउतार आणि अस्थिरता येऊ दिली जाणार नाही. आरबीआय बाजारात यूएस डॉलरचा पुरवठा करत आहे. त्यामुळे रोखीचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आरबीआयच्या या पावलांमुळे रुपयाचा व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे. असुरक्षित परकीय चलनाच्या व्यवहारांबद्दल घाबरण्याऐवजी त्याकडे वस्तुस्थितीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


याप्रसंगी रेपो दरावरील प्रश्नाला उत्तर देताना दास यांनी सांगितले की, तरलता आणि दर वाढविण्याबाबत निर्णय घेताना आरबीआय नेहमीच विकासाचे लक्ष्य लक्षात ठेवते आणि त्यानुसार आरबीआयचे चलनविषयक धोरण धोरण समिती स्वतःची पावले उचलते, असे दास यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी