मुंबई : एकनाथ शिंदे गटातील आमदार खासदारांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याला आता शिवसेनेचे बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊ दाखवावे, असे आव्हान जाधव यांनी राऊतांना दिले आहे.
शिवसेना आमदारांनंतर आता १२ खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना-भाजप युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठोस भूमिका न घेतल्यामुळे आपण शिवसेनेतून बाहेर पडल्याचे या खासदारांनी सांगितले आहे. यावेळी आमदारांप्रमाणेच खासदारांनीही खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेमुळे आम्हाला इतके सगळे मिळाले असे जर राऊतांचे म्हणणे असेल, तर येत्या काळात आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यामध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेचे धनुष्य बाण घेऊन कुठल्याही प्रभागातून निवडून येऊन दाखवावे, असे थेट आव्हान प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
संजय राऊतांप्रमाणेच विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावरही खासदारांची नाराजी असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. लोकसभेत खासदारांना बोलण्यासाठी जो वेळ दिला जातो त्यामध्ये शिवसेनेला मिळालेल्या वेळेपैकी ७० टक्के वेळ अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनीच घेतला आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या मतदारसंघातील विषयांवर बोलायला संधी मिळत नव्हती. त्यामुळेही आम्ही नाराज होतो, असाही आरोप त्यांनी केला आहे.
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…