आता शिक्षक, विद्यार्थ्यांची ‘महास्टुडंट ॲप’द्वारे हजेरी

रत्नागिरी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हा निर्देशांक विकसित केला असून, त्यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांच्या डिजिटल उपस्थितीसाठी गुण देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महास्टुडंट अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपद्वारे सरल प्रणाली अंतर्गत शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल उपस्थिती नोंदवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यांकन करणे सोपे होणार आहे.


शाळांचे शैक्षणिक निकषांचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र शासनाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हा निदेशांक विकसित केला आहे. या निदेशांकामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने हजेरी नोंदविली जाणार असून त्यासाठी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यापूर्वी राज्यात विकसित केलेल्या सरल प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली जात होती. ही नोंदणी केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांची डिजिटल उपस्थिती नोंदवण्यासाठी महास्टुडंट अॅप तयार करण्यात आले आहे.


शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची सरल प्रणाली अंतर्गत महास्टुडंट अॅपद्वारे दैनंदिन हजेरी नोंदवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी गुगल स्टोअरवर असलेले हे अॅप इन्स्टॉल करायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच दररोज शाळेत किती विद्यार्थी उपस्थित राहतात व शिक्षक किती उपस्थित राहतात, याबाबतचे सर्व रेकॉर्ड राहणार असल्याने शिक्षण विभागाला हवे तेव्हा सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. शिक्षकांना वेगळे हजेरी पत्रक ठेवण्याची गरज नाही. तसेच मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत वेगळी माहिती भरण्याची कटकट राहणार नाही. महास्टुडंट अॅपवर सर्च केल्यावर राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद; वाहनचालकांची धावपळ

मंडणगड: गणेशोत्सवादरम्यान मंडणगडमधील एकमेव सीएनजी पंप बंद झाल्याने स्थानिक वाहनचालक आणि गणेशभक्तांची मोठी

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर ५ गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर टोल प्लाझाजवळ कार आणि ट्रकची टक्कर रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील