मोदी सरकार पाडण्याचे षडयंत्र सोनिया गांधींनी रचले होते

नवी दिल्ली : गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी आणि भाजप सरकार पाडण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात ५ लाख रुपये आणि ४८ तासांनंतर २५ लाख रुपये देण्यात आल्याचा दावा रईस खान पठाणने माध्यमांशी संवाद साधताना केला. मी तीस्ता सेटलवाड आणि अहमद पटेल यांच्या डीलचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, असे पठाण म्हणाले.


काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या इशाऱ्यावरून २००२च्या जातीय दंग्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार पाडण्याचे मोठे कारस्थान रचले होते. या कारस्थानात सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व इतर काही लोक सामील होते, असा दावा गुजरात पोलिसांच्या एसआयटीने अहमदाबादच्या सत्र न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. तसेच, अहमद पटेल हे काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. पटेल यांच्याकडून तिस्ता सेटलवाड यांनी ३० लाख रुपये घेतले होते, असे एसआयटीने म्हटले आहे.


सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांचे माजी सहकारी रईस खान पठाण यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. पठाण यांनी दावा केला की, मी आणि तीस्ता यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. तेव्हा सोनिया गांधी यांनी तिस्ता यांच्याकडे निधीची कमतरता आहे का, असा सवाल केला होता. पठाण यांनी सोनियांकडे एसआयटी चौकशीची मागणीही केली आहे.


यासोबतच, अहमद पटेल यांनी नरेंद्र भ्रमभट्ट यांच्याकडून तीस्ताला हे पैसे दिले आणि सांगितले की निधीची कमतरता कधीच भासणार नाही, फक्त उद्देश लक्षात ठेवा. पठाण यांच्या म्हणण्यानुसार, अहमद पटेल यांनी मोदींना तुरुंगात टाका आणि सरकार पाडा, असे म्हटले होते.


तसेच, तीस्ता आणि मी सोनिया गांधींना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटलो होतो, तेव्हा सोनियांनी तिस्ता यांना विचारले होते की निधीमध्ये काही अडचण आहे का? यावर अहमद पटेल यांच्यासोबत सर्व काही होत आहे. असे उत्तर तीस्ता यांनी दिले असल्याचे पठाण यांनी म्हटले आहे. यासोबतच, एसआयटी सोनिया गांधी यांची चौकशी करून सर्व काही स्पष्ट करेल. असेही रईस खान पठाण यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या