तेलवाहू नौका उलटून गुहागरच्या किनाऱ्यावर, प्राणहानी नाही

रत्नागिरी (हिं.स.) : जयगड समुद्रात उलटलेले सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीची अजस्र नौका लाटांच्या तडाख्याने उलटली असून ती सोमवारी मध्यरात्री गुहागरच्या समुद्रकिनारी आली आहे. नौका उलटली असली, तरी प्राणहानी झालेली नाही. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी उगलमुगले आणि गोसावी यांनी या घटनेची नोंद घेतली आहे. ते पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.


सिंगापूर येथील तेल कंपनीची तेलवाहू नौका गेल्या २२ जून रोजी कोलंबो येथून निघाली. ती समुद्रात कलंडल्याने त्याचा समुद्रातील संपर्क तुटला होता. गेल्या ९ जुलैपासून रडारवर या नौकेचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे नौकेचा शोध सुरू होता.


ही नौका रत्नागिरी तालुक्यातील जयगडजवळच्या खोल समुद्रात किनाऱ्यापासून १३ सागरी मैलांवर काल तटरक्षक दलाला आढळली होती. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही नौका पूर्णपणे उलटली. त्यामुळे त्यातील तेल आणि इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या. नौकेवरील कर्मचारी मात्र सुखरूप आहेत. किनाऱ्यावरील नागरिकांनी या नौकेतून वाहत वाहत किनाऱ्यावर आलेल्या वस्तूंना हात लावू नये. तसेच काही संशयित वस्तू आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

शेअर बाजारात मोठे 'सेल ऑफ' या कारणामुळे गुंतवणूकदारांची पंचाईत सेन्सेक्स ३२२.३९ व निफ्टी ७८.२५ अंकांने कोसळला जाणून घ्या उद्याची स्ट्रेटेजी!

मोहित सोमण: अखेर आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अपेक्षित घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३२२.३९ अंकाने घसरला असून

महानगरपालिका निवडणूक; आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई

राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होत नसल्याने आता ते शाखा भेटींवर भर - चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला; मुंबईसह राज्यातील जनता विकासाच्या मागे

मुंबई : “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना आता गर्दी होत नसल्याने ते शाखांना भेटी देत फिरत आहेत”, अशी बोचरी

मनसे शिष्टमंडळाच्या भेटीनंतर निवडणूक आयुक्तांनी मागवला ‘बिनविरोध’ निवडीचा अहवाल - उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल; आयुक्तांकडे अविनाश जाधव यांनी सादर केले पुरावे

मुंबई : राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने, या प्रक्रियेला आक्षेप घेत

एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस वर्षाअखेरपर्यंत दाखल करा.... त्यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास कठोर कारवाई..! — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड दम

मुंबई : सन २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा

Gold Silver Rate: युएस व्हेनेझुएलासह 'या' ४ कारणांमुळे सोने चांदी जोरदार 'रिबाऊंड' एका सत्रात सोने १.४९% व चांदी ३.४९% उसळली

मोहित सोमण: गेल्या आठवड्याच्या तुलनेत भूराजकीय घटनांना वेग आल्याने त्याचा फटका कमोडिटी बाजारातही बसला आहे.