तेलवाहू नौका उलटून गुहागरच्या किनाऱ्यावर, प्राणहानी नाही

रत्नागिरी (हिं.स.) : जयगड समुद्रात उलटलेले सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीची अजस्र नौका लाटांच्या तडाख्याने उलटली असून ती सोमवारी मध्यरात्री गुहागरच्या समुद्रकिनारी आली आहे. नौका उलटली असली, तरी प्राणहानी झालेली नाही. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी उगलमुगले आणि गोसावी यांनी या घटनेची नोंद घेतली आहे. ते पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.


सिंगापूर येथील तेल कंपनीची तेलवाहू नौका गेल्या २२ जून रोजी कोलंबो येथून निघाली. ती समुद्रात कलंडल्याने त्याचा समुद्रातील संपर्क तुटला होता. गेल्या ९ जुलैपासून रडारवर या नौकेचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे नौकेचा शोध सुरू होता.


ही नौका रत्नागिरी तालुक्यातील जयगडजवळच्या खोल समुद्रात किनाऱ्यापासून १३ सागरी मैलांवर काल तटरक्षक दलाला आढळली होती. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही नौका पूर्णपणे उलटली. त्यामुळे त्यातील तेल आणि इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या. नौकेवरील कर्मचारी मात्र सुखरूप आहेत. किनाऱ्यावरील नागरिकांनी या नौकेतून वाहत वाहत किनाऱ्यावर आलेल्या वस्तूंना हात लावू नये. तसेच काही संशयित वस्तू आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

New NFO Launch: आज भारतातील प्रथम स्मार्ट बेटा NFOs फंड एजंल वन कडून गुंतवणूकदारांसाठी खुले जाणून घ्या वैशिष्ट्ये एका क्लिकवर

मोहित सोमण:एजंल वन असेट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीने भारतातील प्रथम स्मार्ट बेटा फंड संबंधित दोन नवे एनएफओ (New Fund Offer NFO)

मविआ नेत्यांच्या मतदारसंघांतील मुसलमान दुबार मतदारांचे काय ? मविआचे आमदार राजीनामा देणार का ?

मुंबई : निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न राज ठाकरे, उद्धव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते करत आहेत.

आताची सर्वात मोठी बातमी: अनिल अंबानी यांच्या घरासह समुह कंपनीच्या ३०८४ कोटींच्या मालमत्ता जप्त, ईडी कारवाईचा वेग वाढला !

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या भोवतीचा फास आणखी आवळला गेल्याने पुन्हा एकदा अनिल अंबानी संकटात सापडले

Telangana Bus Accident : थरकाप उडवणारा अपघात! हायस्पीड लॉरी थेट बसमध्ये घुसली; किंचाळ्या आणि रक्ताचा सडा; २० हून अधिक लोकांचा दुर्दैवी अंत!

तेलंगणा : तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी (Rangareddy) जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल (Chevella Mandal) येथे झालेल्या एका भीषण बस

गणेश काळे हत्या प्रकरण, आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी

पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने, गायकवाड टोळीचा म्होरक्या समीर काळे

ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय