अफ्रिकेतील घाना देशात मारबर्ग विषाणूचा संसर्ग; डब्ल्यूएचओ कडून अलर्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वच देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना आता आणखी एका व्हायरसने जगाचे टेन्शन वाढवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना आणि इबोलाहून अधिक जीवघेणा हा व्हायरस असल्याचे म्हटले जात आहे. पश्चिम अफ्रिकेतील घाना देशात 'मारबर्ग' या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


घानातील दक्षिण अशांती भागात या विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे या विषाणूचा संसर्ग वेग आणि मृत्यूदर अधिक असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मारबर्ग विषाणू संसर्ग झालेल्या प्राण्यामधूनही पसरतो. यात वटवाघळाचाही समावेश आहे. हा विषाणू ज्याला संसर्ग झाला त्याच्यावर वेगाने परिणाम करतो. यामुळे बाधित व्यक्तिला तीव्र ताप, अंतर्गत व बाह्य रक्तस्राव आणि गंभीर डोकेदुखीचा त्रास जाणवतो.


मारबर्ग विषाणू इबोला विषाणू इतकाच जीवघेणा आहे आणि त्यावर अद्याप कोणतेही औषधोपचार किंवा लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत अलर्ट जारी केला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, मारबर्ग विषाणूबाबत त्वरित खबरदारी न घेतल्यास या विषाणूच्या प्रसारामुळे परिस्थिती अनियंत्रणात येऊ शकते.

Comments
Add Comment

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना