मुंबईकरांची पाणी चिंता मिटली!

  93

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मुंबईकरांची पुढील दहा महिन्यांची पाणी चिंता मिटली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या ८४.४१ टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे. पाऊस असाच सुरू राहील तर अवघ्या काही दिवसांत सर्व तलाव १०० टक्के भरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला होता. या तलावांत ९ टक्क्यांपर्यंत जलसाठा उतरला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात देखील केली होती. मात्र जलसाठ्यात वाढ झाल्यानंतर पाणी कपात रद्द करण्यात आली.



जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली. सातही धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली. सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातही धरणांमध्ये ८४.२१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या धरणांमध्ये १२,२१,७८३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास लवकरच १०० टक्के पाणी साठा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच मोडक सागर, तुळशी आणि तानसा हे तिन्ही तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे मुंबईकरांची पुढील दहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जलसाठा इतक्या लवकर मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे.


मुंबईकरांना वर्षभराला १४,४६,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. आज मितीस तलावांमध्ये १२,२१,७८३ दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. म्हणजेच धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा जमा होण्यासाठी केवळ २,२५,५८० दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज आहे. जर असाच पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिला तर लवकरच पाणीसाठा १०० टक्के होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Comments
Add Comment

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी