Categories: रायगड

जेएसडब्ल्यू कंपनीने पाणी जाण्याचे मार्ग रोखला; गडब गावात पूरसदृश स्थिती

Share

पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड डोलवी कंपनीने गडब परिसरातील जमिनी अल्प मोबदल्यात खरेदी केल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच पहिल्याच पावसात गावाच्या पलीकडे असणाऱ्या घरांना पावसाच्या पाण्याचा वेढा बसल्याने गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. त्यातच रात्रीची वेळ असल्याने कुठे जायचे? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जे एसडब्ल्यू कंपनीने पाणी जाण्याचा निचरा न केल्याने गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील ठरावीक लोकांना ठेका दिल्याने जी बांध बंदिस्ती बांधली आहे, त्यामुळे नाल्याचा आकार अरुंद झाला आहे. त्यातच पाणी जाण्यासाठी मार्ग न राहिल्याने संपूर्ण पाणी गावाकडे फेकले जाते. परिणामी पावसामुळे गावात मोठा पूर आल्याचा भास होतो. त्यामुळे लोकांना कंपनीकडे गाऱ्हाणे मांडण्याशिवाय पर्याय उरत नाही.

खारमाचेला गावातील निम्म्यापेक्षा जास्त जमिनी अल्प दरात खरेदी केल्याने राहिलेल्या जमिनींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे. शेतात वाढणाऱ्या मँग्रोमच्या झाडांमुळे कंपनीला जमीन विकण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कंपनी वेळोवेळी आपली कटू नीती शेतकऱ्यांना दाखवते आणि त्याला हा गरीब शेतकरी बळी पडतो. त्यामुळे गडब गावाला पुराचा धोका संभवतो. काही वर्षांनी कंपनीमुळे गडब गाव उठवण्याची वेळ नाकारता येत नाही.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

4 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

32 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago