रानभाज्या खरेदीसाठी पेणमध्ये नागरिकांनी केली गर्दी

देवा पेरवी


पेण : पेण लगतच्या ग्रामीण परिसरात सध्या वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सव सुरू झाल्याचे भासत आहे. जंगलातील रानभाज्या घेण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे. पेण लगतच्या बळवली, दुरशेत, विरानी, कोटबी, कासमाल, बोरगाव, वरसई, शेने आदी गावांतील रानमेवा प्रसिद्ध आहे. निसर्ग संपदेने बहरलेल्या विविध आयुर्वेदिक जडीबुटी, रानमेवा व रानभाज्यांनी पेण मार्केटमध्ये पावसाळ्यात रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते.


पहिल्या पावसाच्या आगमनानंतर लगेच जुलै महिन्यात रानभाज्या यायला सुरुवात होते. या काळामध्ये पेण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या गरीब आदिवासी लोकांच्या हाताला कामे नसल्याने अशा वेळी घरातील किराणा सामान व इतर धान्य संपण्याच्या मार्गावर असते. अशा वेळी आदिवासींना निसर्गाची साथ मिळते. आणि त्यांचा उदरनिर्वाह पावसाळ्याचे चार महीने चालतो.


करटुले, भारंग, आकुर, शेवळ यांना मागणी


जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून ऑगस्टपर्यंत रानभाज्यांची रेलचेल असते. करटुले, भारंग, आकुर, शेवळ, टाकळा, कुरुदू, रानमाठ, तेरी, काटा, दिंडा, आम्बाडी, घोळू आदी रानभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. रानभाज्या पोषक आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. या मोसमात तरोटा, करटुले आदी भाज्या खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे पेणच्या ग्रामीण भागातील रानभाज्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करतात.


रान भाज्या शरिराला पौष्टिक


पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या पौष्टिक असतात. ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. या भाज्या उकडून शिजवल्या जातात. करटुलेसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग