महागाई व जीएसटीवरून गदारोळ

Share

नवी दिल्ली : महागाई व जीएसटी दरवाढीवरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ घातला. या गदारोळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विविध मुद्यांवर विरोधी सदस्यांनी केलेला गदारोळ आणि आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यामुळे राज्यसभेचे कामकाज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १८) सुरू झाल्यानंतर तासाभरातच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

काँग्रेसचे अनेक सदस्य आसनाजवळ आले आणि विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. महागाईसह विविध मुद्द्यांवर ते सरकारला जाब विचारत होते. व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आणि सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

यावर व्यंकय्या नायडू म्हणाले की, काही सदस्यांनी सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा निर्णय घेतल्याचे दिसते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सदस्यांना मतदान करता यावे, यासाठी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करत असल्याचे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभा आणि लोकसभेच्या नवीन खासदारांना शपथ देण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली. तर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यानंतर नायडू म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे. यावेळी प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळाले. हे अधिवेशन सार्थक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, असेही व्यंकय्या नायडू म्हणाले.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago