आज नीट यूजी परीक्षा; उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

मुंबई : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट ची परीक्षा आज १७ जुलै रोजी होणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांपर्यंत नीटची परीक्षा पार पडेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेपूर्वी एनटीए कडून नीट उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.


neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटीसद्वारे, एनटीए ने परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी पाळावयाच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती दिली आहे. मार्गदर्शक तत्त्वे परीक्षेला बसणारे उमेदवार कॅज्युअल कपडे घालू शकतात. विद्यार्थी चप्पल घालू शकतात. परंतु, विद्यार्थ्यांनी परिक्षेला बसताना बूट घालणे टाळावे. परीक्षा केंद्रात पारंपारिक कपडे परिधान करण्यास मनाई आहे. परीक्षेच्या वेळेच्या दोन तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे बायोमेट्रिक्स तपासले जाईल. त्यामुळे त्यांनी हलके कपडे परिधान करून केंद्रावर पोहोचावे जेणेकरून वेळ वाया जाणार नाही.


परीक्षेसाठी उमेदवारांनी निळ्या किंवा काळा बॉल पेन सोबत बाळगणे आवश्यक आहे. उमेदवारांनी नीट यूजी २०२२ प्रवेशपत्र स्व-घोषणापत्र आणि हमीपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. उमेदवारांना एक पारदर्शक पाण्याची बाटली आणि हँड सॅनिटायझरची ५० मिलीची बाटली बाळगण्याची परवानगी आहे. उमेदवारांना प्रवेशपत्रावर लावण्यासाठी पोस्टकार्ड आकाराचा फोटो किंवा एखादा अतिरिक्त फोटो घेऊन जाण्यास परवानगी आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेच्या वस्तू परीक्षा केंद्रावर नेण्यास मनाई आहे.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या