सुरक्षा रक्षकाचा खून सप्तशृंग गडावर खळबळ

कळवण (वार्ताहर) : सप्तशृंग गडाच्या ट्रस्टमध्ये नोकरीस असलेल्या सुरक्षारक्षक अर्जुन अंबादास पवार (वय ३०) याचा खून झाल्याची घटना समोर आल्याने सप्तशृंग गडावर खळबळ उडाली आहे. नांदुरी ते गड घाट रस्त्यादरम्यान गणेश घाटाच्या धबधब्यापुढे त्याचा मृतदेह सापडला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये गणेश घाटाच्या धबधब्याजवळ एक तरुण पडलेला असल्याचे गडावर दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांनी पाहिले. त्यांनी न्यासाच्या कार्यालयास याबाबतची माहिती दिली. घटनास्थळावर प्रशासनाने रुग्णवाहिका पाठविली व या सुरक्षा रक्षकास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.


वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. त्याच्या मानेवर व शरीरावरील जखमांमुळे घातपात झाल्याची शंका नातेवाइकांनी व्यक्त केली. ट्रस्टकडून अधिकारी व पोलिसांना माहिती देण्यात आली. अर्जुन पवार हा सप्तशृंग संस्थानमध्ये सुरक्षारक्षक होता. भेंडी (ता. कळवण) येथे सासूरवाडीला राहून गडावर नोकरीनिमित्त तो ये -जा करत होता.


याप्रकरणी कळवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान नागरे अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात

Govind Barge Death : माजी उपसरपंच बर्गे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या; यंदाची दिवाळीही...

बीड : बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच

Chandshaili Ghat Accident : नंदुरबारच्या चांदशैली घाटात भीषण अपघात; भाविकांची पीकअप जीप दरीत कोसळून ६ ठार, १५ हून अधिक गंभीर जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यांच्या

ट्रेनच्या AC कोचमध्ये प्रवाशांसाठी नवी सुविधा, मळक्या ब्लँकेट्सचा त्रास संपला.

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या स्वछता आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेच्या बेडरोलमध्ये

ऐन दिवाळीत पाऊस पडणार! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस

राज्यातील १४३ बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांवर सर्वसमावेशक निर्बंध (ऑल