कळवण (वार्ताहर) : सप्तशृंग गडाच्या ट्रस्टमध्ये नोकरीस असलेल्या सुरक्षारक्षक अर्जुन अंबादास पवार (वय ३०) याचा खून झाल्याची घटना समोर आल्याने सप्तशृंग गडावर खळबळ उडाली आहे. नांदुरी ते गड घाट रस्त्यादरम्यान गणेश घाटाच्या धबधब्यापुढे त्याचा मृतदेह सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये गणेश घाटाच्या धबधब्याजवळ एक तरुण पडलेला असल्याचे गडावर दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांनी पाहिले. त्यांनी न्यासाच्या कार्यालयास याबाबतची माहिती दिली. घटनास्थळावर प्रशासनाने रुग्णवाहिका पाठविली व या सुरक्षा रक्षकास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. त्याच्या मानेवर व शरीरावरील जखमांमुळे घातपात झाल्याची शंका नातेवाइकांनी व्यक्त केली. ट्रस्टकडून अधिकारी व पोलिसांना माहिती देण्यात आली. अर्जुन पवार हा सप्तशृंग संस्थानमध्ये सुरक्षारक्षक होता. भेंडी (ता. कळवण) येथे सासूरवाडीला राहून गडावर नोकरीनिमित्त तो ये -जा करत होता.
याप्रकरणी कळवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान नागरे अधिक तपास करीत आहेत.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…