खड्ड्यांमुळे ठाण्यात वाहतूक कोंडी

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मुख्य मार्ग आणि महामार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीसमोर ठाणे पोलिसांनीही आता गुडघे टेकल्याचे बोलले जाते. नागरिकांनी अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका किंवा रेल्वेगाड्यांतूनच प्रवास करा, अशा सूचना त्यांनी वाहन चालकांना दिल्या आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे. ठाणे पोलिसांच्या ट्विटर खात्यावरून त्यांनी ही सूचना प्रसारित केली आहे.


पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूलाच्या पायथ्याशी खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोपरी रेल्वे पूल ते कॅडबरी जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे ठाणे, घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले.


पूर्व द्रुतगती महामार्गावरून हजारो वाहनांची वाहतूक होते. येथील कोपरी पूलाच्या पायथ्याशी ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे सकाळी या मार्गावर कोपरी पूल ते कॅडबरी जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी होते. कामानिमित्त मुंबईत खासगी वाहनाने जाणाऱ्या वाहन चालकांचे या वाहतूक कोंडीमुळे हाल झाले. तर या मार्गावरुन बेस्ट, टीएमटीच्या बसगाड्याही अडकून होत्या. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत होता. अवघे १० मिनिटांचे अंतर पार करण्यास वाहन चालकांना पाऊण तास लागत आहे.


खारेगाव टोलनाका भागातही मोठे खड्डे पडल्याने शिळफाटा, गॅमन रोड, दहिसर मोरी, वाय जंक्शन, मुंब्रा बाह्यवळण भागात त्याचा परिणाम वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ट्विटर खात्यावर वाहन चालकांना सूचना केल्या आहेत.

Comments
Add Comment

'म्हाडासाथी' एआय चॅटबॉटचे लोकार्पण, म्हाडाचे आणखी एक तंत्रस्नेही पाऊल

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक लोकाभिमुख संस्था असून

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही हे आधी वाचा...नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :