आता रागावण्याचे दिवस राहिले नाहीत; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

नवी मुंबई (वार्ताहर) : उद्धव ठाकरे रागावले हे फक्त त्यांच्या पत्नीने पाहिले आहे. त्यामुळे फोनवर झालेल्या बोलण्यावरून मी रागावलो आहे, असे म्हणणे योग्य नसून उद्धव ठाकरे यांचे आता रागवण्याचे दिवस राहिले नाहीत, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशीत उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत म्हटले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम असे म्हटल्याने मी रागावलो होतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर राणे यांना पत्रकारांनी विचारले असता वरील वक्तव्य राणे यांनी केले.


आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या अानुषंगाने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम म्हटल्यावर मी भडकलो, त्यानंतर त्यांनी जय श्रीराम असे म्हटले, असे उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले. याबाबत राणे यांना विचारले असता उद्धव ठाकरे हे घरीच बसले होते आणि फोन घेतला होता. त्यामुळे ठाकरे रागावले आहेत हे कुणीच सांगितले नसून त्यांनी त्यांच्या तोंडूनच सांगितले आहे. त्यामुळे रागवण्याइतके दिवस उद्धव ठाकरे यांचे राहिले नसून त्यांचे कसे चालले आहे ते दिसतच आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे आज कोणी नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही, असा घणाघातही नारायण राणे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेल्या आरोपांच्या बाबतीत उत्तर देताना केला.


‘राजनाथ सिंह देशाचे संरक्षण मंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी रागवावे असे त्यांचे दिवस राहिलेले नाहीत. काय वाईट परिस्थिती आली आहे. त्यांना हात जोडत फिरावे लागत आहे,’ असाही खोचक टोला राणेंनी लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असा खोचक टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले, ‘या सरकारचे मंत्रिमंडळ तर झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यात आहेत, तर उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. आज ते कुणीच नाहीत’.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर