आता रागावण्याचे दिवस राहिले नाहीत; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

नवी मुंबई (वार्ताहर) : उद्धव ठाकरे रागावले हे फक्त त्यांच्या पत्नीने पाहिले आहे. त्यामुळे फोनवर झालेल्या बोलण्यावरून मी रागावलो आहे, असे म्हणणे योग्य नसून उद्धव ठाकरे यांचे आता रागवण्याचे दिवस राहिले नाहीत, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशीत उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत म्हटले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम असे म्हटल्याने मी रागावलो होतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर राणे यांना पत्रकारांनी विचारले असता वरील वक्तव्य राणे यांनी केले.


आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या अानुषंगाने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम म्हटल्यावर मी भडकलो, त्यानंतर त्यांनी जय श्रीराम असे म्हटले, असे उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले. याबाबत राणे यांना विचारले असता उद्धव ठाकरे हे घरीच बसले होते आणि फोन घेतला होता. त्यामुळे ठाकरे रागावले आहेत हे कुणीच सांगितले नसून त्यांनी त्यांच्या तोंडूनच सांगितले आहे. त्यामुळे रागवण्याइतके दिवस उद्धव ठाकरे यांचे राहिले नसून त्यांचे कसे चालले आहे ते दिसतच आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे आज कोणी नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही, असा घणाघातही नारायण राणे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेल्या आरोपांच्या बाबतीत उत्तर देताना केला.


‘राजनाथ सिंह देशाचे संरक्षण मंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी रागवावे असे त्यांचे दिवस राहिलेले नाहीत. काय वाईट परिस्थिती आली आहे. त्यांना हात जोडत फिरावे लागत आहे,’ असाही खोचक टोला राणेंनी लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असा खोचक टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले, ‘या सरकारचे मंत्रिमंडळ तर झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यात आहेत, तर उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. आज ते कुणीच नाहीत’.

Comments
Add Comment

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना

विजय मल्ल्या भारतात परतणारच नसतील, तर आम्ही याचिका का ऐकावी?

मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल मुंबई  : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याने आधी भारतात परत यावे. आम्ही तातडीने