आता रागावण्याचे दिवस राहिले नाहीत; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

नवी मुंबई (वार्ताहर) : उद्धव ठाकरे रागावले हे फक्त त्यांच्या पत्नीने पाहिले आहे. त्यामुळे फोनवर झालेल्या बोलण्यावरून मी रागावलो आहे, असे म्हणणे योग्य नसून उद्धव ठाकरे यांचे आता रागवण्याचे दिवस राहिले नाहीत, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशीत उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत म्हटले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम असे म्हटल्याने मी रागावलो होतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर राणे यांना पत्रकारांनी विचारले असता वरील वक्तव्य राणे यांनी केले.


आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या अानुषंगाने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम म्हटल्यावर मी भडकलो, त्यानंतर त्यांनी जय श्रीराम असे म्हटले, असे उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले. याबाबत राणे यांना विचारले असता उद्धव ठाकरे हे घरीच बसले होते आणि फोन घेतला होता. त्यामुळे ठाकरे रागावले आहेत हे कुणीच सांगितले नसून त्यांनी त्यांच्या तोंडूनच सांगितले आहे. त्यामुळे रागवण्याइतके दिवस उद्धव ठाकरे यांचे राहिले नसून त्यांचे कसे चालले आहे ते दिसतच आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे आज कोणी नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही, असा घणाघातही नारायण राणे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेल्या आरोपांच्या बाबतीत उत्तर देताना केला.


‘राजनाथ सिंह देशाचे संरक्षण मंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी रागवावे असे त्यांचे दिवस राहिलेले नाहीत. काय वाईट परिस्थिती आली आहे. त्यांना हात जोडत फिरावे लागत आहे,’ असाही खोचक टोला राणेंनी लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असा खोचक टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले, ‘या सरकारचे मंत्रिमंडळ तर झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यात आहेत, तर उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. आज ते कुणीच नाहीत’.

Comments
Add Comment

प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण

कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता