आता रागावण्याचे दिवस राहिले नाहीत; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

  100

नवी मुंबई (वार्ताहर) : उद्धव ठाकरे रागावले हे फक्त त्यांच्या पत्नीने पाहिले आहे. त्यामुळे फोनवर झालेल्या बोलण्यावरून मी रागावलो आहे, असे म्हणणे योग्य नसून उद्धव ठाकरे यांचे आता रागवण्याचे दिवस राहिले नाहीत, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशीत उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत म्हटले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम असे म्हटल्याने मी रागावलो होतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर राणे यांना पत्रकारांनी विचारले असता वरील वक्तव्य राणे यांनी केले.


आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या अानुषंगाने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम म्हटल्यावर मी भडकलो, त्यानंतर त्यांनी जय श्रीराम असे म्हटले, असे उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले. याबाबत राणे यांना विचारले असता उद्धव ठाकरे हे घरीच बसले होते आणि फोन घेतला होता. त्यामुळे ठाकरे रागावले आहेत हे कुणीच सांगितले नसून त्यांनी त्यांच्या तोंडूनच सांगितले आहे. त्यामुळे रागवण्याइतके दिवस उद्धव ठाकरे यांचे राहिले नसून त्यांचे कसे चालले आहे ते दिसतच आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे आज कोणी नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही, असा घणाघातही नारायण राणे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेल्या आरोपांच्या बाबतीत उत्तर देताना केला.


‘राजनाथ सिंह देशाचे संरक्षण मंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी रागवावे असे त्यांचे दिवस राहिलेले नाहीत. काय वाईट परिस्थिती आली आहे. त्यांना हात जोडत फिरावे लागत आहे,’ असाही खोचक टोला राणेंनी लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असा खोचक टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले, ‘या सरकारचे मंत्रिमंडळ तर झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यात आहेत, तर उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. आज ते कुणीच नाहीत’.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर