गुरूंचे आशीर्वाद भारताला नव्या उंचीवर घेऊन जावोत : पंतप्रधान

  126

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर संदेश जारी केला आहे.


https://twitter.com/narendramodi/status/1547047846611808256

गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा. हा दिवस आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या आणि जीवनाविषयी अनेक गोष्टी शिकविणाऱ्या सर्व अनुकरणीय गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. आपल्या समाजाने शिक्षण आणि विद्वत्तेला प्रचंड महत्त्व दिले आहे. आपल्या गुरूंचे आशीर्वाद भारत देशाला नव्या उंचीवर घेऊन जावोत हीच सदिच्छा, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


https://twitter.com/narendramodi/status/1547048166981513216

आषाढ पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी सर्वांना शुभेच्छा. या निमित्ताने आपण भगवान बुद्धांच्या उदात्त शिकवणींचे स्मरण करूया आणि त्यांच्या ज्ञानी दृष्टीने कल्पिलेल्या न्यायी आणि दयाळू समाज प्रत्यक्षात साकारण्यासाठीच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करूया, असेही ते म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

देशातील गरिबीचा दर घसरला

२०११ पासून १७ कोटी भारतीय लोक गरिबीतून आले बाहेर नवी दिल्ली : भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा समान समाज बनला आहे.

CA Exam Result: सीए परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबई-ठाण्याच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

सीए अंतिम परीक्षेत मुंबईचा 'टॉपर' मुंबई: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)कडून मे २०२५

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान हादरला! भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनकडून खरेदी करणार KJ500 रडार

नवी दिल्ली: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. भारतीय सैन्याच्या आक्रमक तयारीने आणि

Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी

Bihar polls: सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो; 'हा महिलांचा अपमान' महिलांची टीका

पाटणा : बिहार काँग्रेसने "प्रियदर्शिनी उड्डाण योजना" अंतर्गत पाच लाख सॅनिटरी पॅड बॉक्स वाटप करण्याची घोषणा केली

शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू

बाराबंकी : शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील