पंढरीत कचऱ्याचा महापूर; साथीच्या आजाराची लक्षणे

Share

सोलापूर : पंढरपूर मधील आषाढी यात्रा संपल्यानंतर आता पालिका प्रशासनासमोर कचरा उचलण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या परिसरात शेकडो टन कचरा पडला आहे. पावसामुळे साथीच्या आजाराची भीती बळावली आहे. सध्या तरी पालिकेच्या आरोग्य विभागाने युद्धपातळीवर स्वच्छता आणि साफसफाई मोहीम राबवत कचरा उचलण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र कचऱ्याचे प्रमाण खूपच असल्याने आणखी काही दिवस शहरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यंदा आषाढी एकादशीसाठी सुमारे १५ लाख भाविक आले होते. गेल्या काही वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी प्रथमच झाली होती. या सोहळ्यासाठी आलेले लाखो भाविक सोमवारी, मंगळवारी परतले असले तरी त्यांच्यामुळे लागलेल्या कचऱ्याचे ढिगारे शहरातील नागरिकांच्या आरोग्यासमोर आव्हान बनले आहे. प्रचंड प्रमाणात पडलेला कचरा आणि त्यात भर म्हणजे दिवसभर अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस, ढगाळ, कोंदट वातावरण यामुळे दुर्गंधी वाढीस लागली आहे. शहरातील प्रमुख मार्ग, मंदिरे आणि मठांच्या परिसरात पडलेली खराब फळे, अन्नपदार्थ, कागदे, प्लास्टिक कचरा, या भागात झालेला कचरा, उघड्यावर शौच केल्याने निर्माण झालेली दुर्गंधी, चिखल व खड्यात साठलेले पाणी अशा भीषण परिस्थितीमुळे या भागात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. याप्रकारची लक्षणेही दिसू लागली आहेत.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

9 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

34 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

1 hour ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago