पंढरीत कचऱ्याचा महापूर; साथीच्या आजाराची लक्षणे

सोलापूर : पंढरपूर मधील आषाढी यात्रा संपल्यानंतर आता पालिका प्रशासनासमोर कचरा उचलण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या परिसरात शेकडो टन कचरा पडला आहे. पावसामुळे साथीच्या आजाराची भीती बळावली आहे. सध्या तरी पालिकेच्या आरोग्य विभागाने युद्धपातळीवर स्वच्छता आणि साफसफाई मोहीम राबवत कचरा उचलण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र कचऱ्याचे प्रमाण खूपच असल्याने आणखी काही दिवस शहरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


यंदा आषाढी एकादशीसाठी सुमारे १५ लाख भाविक आले होते. गेल्या काही वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी प्रथमच झाली होती. या सोहळ्यासाठी आलेले लाखो भाविक सोमवारी, मंगळवारी परतले असले तरी त्यांच्यामुळे लागलेल्या कचऱ्याचे ढिगारे शहरातील नागरिकांच्या आरोग्यासमोर आव्हान बनले आहे. प्रचंड प्रमाणात पडलेला कचरा आणि त्यात भर म्हणजे दिवसभर अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस, ढगाळ, कोंदट वातावरण यामुळे दुर्गंधी वाढीस लागली आहे. शहरातील प्रमुख मार्ग, मंदिरे आणि मठांच्या परिसरात पडलेली खराब फळे, अन्नपदार्थ, कागदे, प्लास्टिक कचरा, या भागात झालेला कचरा, उघड्यावर शौच केल्याने निर्माण झालेली दुर्गंधी, चिखल व खड्यात साठलेले पाणी अशा भीषण परिस्थितीमुळे या भागात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. याप्रकारची लक्षणेही दिसू लागली आहेत.

Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध