दिल्ली विमानतळावर ४५ पिस्तुले जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हिएतनाममधून दिल्ली विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून एक दोन नव्हे तर, तब्बल ४५ पिस्तुले जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर एका भारतीय जोडप्याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती इंदिरा गांधी विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे.


आयजीआय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिएतनामहून आलेल्या एका भारतीय जोडप्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन ट्रॉली बॅगमधून २२ लाखांहून अधिक किमतीची ४५ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. आरोपींनी यापूर्वी १२ लाखांहून अधिक किंमतीच्या २५ पिस्तुलांच्या तस्करीत सहभाग असल्याची कबुली दिली आहे.


दरम्यान, संबंधित जोडपे व्हिएतनामहून दिल्ली विमानतळावर उतरले होते. त्यांच्याकडे ट्रॉली बॅग होती. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिस्तुले भरलेली होती. त्यामुळे हे दोघेही विमानतळाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. तसेच त्यांची हालचालही संशयास्पद वाटल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील ट्रॉली बॅग तपासली. त्यावेळी यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र असल्याची बाब निदर्शनास आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पिस्तुले बॅगेत भरलेली पाहून विमानतळावरील अधिकारीही काही काळ चक्रावून गेली. करण्यात आलेल्या या कारवाईनंतर संबंधित जोडप्याकडील बॅग जप्त करण्यात आली असून, ही शस्त्रे कोणाकडे पोहोचवण्यात येणार होती याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Comments
Add Comment

संजय गांधी.. माधवराव सिंधिया ते अजितदादा; विमान अपघातात देशाने मोठे नेते गमविले

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. लँडिंग करताना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक