पुणे विद्यापीठात संगणकाच्या साहाय्याने होणार उत्तरपत्रिकांची तपासणी

पुणे (हिं.स.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता संगणकाच्या साहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी पद्धती (डिजिटल इव्हॅल्युएशन सिस्टिम) वापरली जाणार आहे. त्यासाठीची प्रणाली विद्यापीठाने विकसित केली असून, प्रायोगिक तत्त्वावर पदव्युत्तर स्तरापासून अंमलबजावणी करून पुढील टप्प्यात पदवीस्तर आणि संलग्न महाविद्यालयांसाठीही ही पद्धत वापरण्याचे नियोजन आहे.


पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील सुमारे एक हजार महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. त्यामुळे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जाते. सध्या उत्तरपत्रिकांची तपासणी केंद्रीय (कॅप) स्तरावर प्राध्यापकांकडून करण्यात येते. मात्र या प्रक्रियेत काहीवेळा त्रुटी राहतात, निकाल जाहीर होण्यास विलंब होतो.


आता विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातील काही मोजक्या विद्यापीठांमध्ये ही पद्धती वापरली जात आहे. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑक्टोबरपासून या पद्धतीची अंमलबजावणी विद्यापीठ संकुलातील सर्व शैक्षणिक विभागांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांपासून करण्याचे नियोजन आहे.

Comments
Add Comment

वायू प्रदूषण हे मुंबईतील सर्वांत गंभीर नागरी आव्हानांपैकी एक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'वायू प्रदूषण हे मुंबईसमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर नागरी आव्हानांपैकी एक आहे.

मालाड रामबागमधील अनेक वर्षांपासूनचा अंधार झाला दूर

रस्त्याच्या विकासासह पिण्याचे पाणी, तुंबणाऱ्या पाण्याचीही मिटली समस्या स्थानिक नगरसेविका योगिता कोळी यांच्या

New Mini Compactor : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ताफ्यात ३० नवीन मिनी कॉम्पॅक्टर!

कचरा अधिक वाहून नेण्याची क्षमता कॉम्पॅक्टर लवकर खराब न होण्यासाठी केली वेगळी सुधारणा भविष्यात कचरा गाड्यांचे

मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालयात खळबळ; गेस्ट स्पीकरवर विद्यार्थिनींचे गैरवर्तनाचे आरोप

मुंबई : दक्षिण मुंबईतील नामांकित सेंट झेवियर्स महाविद्यालयात एका गेस्ट स्पीकरने विद्यार्थिनींशी गैरवर्तन

New Aadhaar Card : आधार कार्डचा गैरवापर थांबणार! आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card; जुन्या कार्डापेक्षा किती वेगळं आणि सुरक्षित?

मुंबई : सध्या बँक असो, महाविद्यालय असो किंवा इतर कोणतेही शासकीय काम; ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार

रेल्वेतील चहा-नाश्त्यावर आयआरसीटीसीची नजर

मुंबई  : रेल्वे प्रवासात चहा, नाश्ता किंवा पाणी विकत घेताना छापील दरापेक्षा जादा पैसे आकारले जात असल्याच्या अनेक