चार दिवसांनंतर अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात

  83

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ढगफुटीनंतर ४ दिवस ब्रेक लागलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. भाविक बालटालमार्गे बाबा बर्फानीच्या गुहेकडे रवाना होत आहेत. पहलगामनंतर मंगळवारी अमरनाथ यात्रा बालटाल मार्गे सुरू झाली आहे. ८ जुलै रोजी पवित्र गुहेजवळ ढगफुटीनंतर पूर आला होता. या अपघातात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४१ जणांचा शोध अद्यापही लागलेला नाही. बचाव पथक तीन दिवसांपासून अपघातग्रस्त भागाचा शोध घेत आहे. शुक्रवारी (८ जुलै) झालेल्या ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली होती. आता पहलगामचा रस्ता भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. बाबांचे भक्त पहलगाम आणि बालटाल मार्गे अमरनाथ गुहेत पोहोचत आहेत.


पवित्र अमरनाथ गुहा दक्षिण काश्मीरमध्ये ३८८० मीटर उंचीवर आहे. अमरनाथ श्राइन बोर्ड वार्षिक अमरनाथ यात्रेचे व्यवस्थापन करते. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे त्याचे अध्यक्ष आहेत.


धोकादायक ठिकाणी तीर्थक्षेत्र शिबीर उभारल्याच्या आरोपांवर राजभवनने स्पष्टीकरण दिले आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, राजभवनच्या प्रवक्त्याने सांगितले की, शुक्रवारी ढगफुटी होऊन पूर आला, आणि तो अपेक्षेपेक्षा जास्त होता आणि यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमधील बेस कॅम्पमधून यात्रेकरुंचा पहिला गट अमरनाथच्या गुहेकडे जाण्यासाठी रवाना झाला आहे. यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके