Categories: देश

चार दिवसांनंतर अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ढगफुटीनंतर ४ दिवस ब्रेक लागलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. भाविक बालटालमार्गे बाबा बर्फानीच्या गुहेकडे रवाना होत आहेत. पहलगामनंतर मंगळवारी अमरनाथ यात्रा बालटाल मार्गे सुरू झाली आहे. ८ जुलै रोजी पवित्र गुहेजवळ ढगफुटीनंतर पूर आला होता. या अपघातात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४१ जणांचा शोध अद्यापही लागलेला नाही. बचाव पथक तीन दिवसांपासून अपघातग्रस्त भागाचा शोध घेत आहे. शुक्रवारी (८ जुलै) झालेल्या ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली होती. आता पहलगामचा रस्ता भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. बाबांचे भक्त पहलगाम आणि बालटाल मार्गे अमरनाथ गुहेत पोहोचत आहेत.

पवित्र अमरनाथ गुहा दक्षिण काश्मीरमध्ये ३८८० मीटर उंचीवर आहे. अमरनाथ श्राइन बोर्ड वार्षिक अमरनाथ यात्रेचे व्यवस्थापन करते. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे त्याचे अध्यक्ष आहेत.

धोकादायक ठिकाणी तीर्थक्षेत्र शिबीर उभारल्याच्या आरोपांवर राजभवनने स्पष्टीकरण दिले आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, राजभवनच्या प्रवक्त्याने सांगितले की, शुक्रवारी ढगफुटी होऊन पूर आला, आणि तो अपेक्षेपेक्षा जास्त होता आणि यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमधील बेस कॅम्पमधून यात्रेकरुंचा पहिला गट अमरनाथच्या गुहेकडे जाण्यासाठी रवाना झाला आहे. यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

9 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

30 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

1 hour ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago