पश्चिम विदर्भात महिनाभरात वीज पडून २२ जणांचा मृत्यू; हजारांहून अधिक घरांची पडझड

अमरावती (हिं.स.) : पश्चिम विदर्भात यंदाच्या पावसाळ्यात अंगावर वीज पडल्याने २२ व पुरात वाहून गेल्याने दोन अशा एकूण २४ जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय आपत्तीमध्ये लहान-मोठी ११४ जनावरे मृत्यूमुखी पडलेली आहे. ४२ गोठे व १४०८ घरांची पडझड झालेली आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे काठालगतची १,१४९ हेक्टर शेतजमीन खरडली गेली, तर १७,९३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे.


विभागात आतापर्यंत पावसाची २३२.६ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४५.५ मिमी पाऊस झालेला आहे. ही १०५.५ टक्के सरासरी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २३६.८ मिमी, यवतमाळ २९५.३ मिमी, अकोला २१०.६ मिमी, बुलडाणा २१७.१ मिमी व वाशिम जिल्ह्यात २३८.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ५ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. ती अजूनही सुरूच आहे. यादरम्यान अंगावर वीज पडल्याने अमरावती जिल्ह्यात सहा, अकोला जिल्ह्यात दोन, यवतमाळ जिल्ह्यात आठ, बुलडाणा जिल्ह्यात दोन व वाशिम जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती पुरात वाहून गेलेली आहे. यापैकी १८ प्रकरणांमध्ये प्रत्येकी चार लाखांची मदत जिल्हा प्रशासनाद्वारे देण्यात आलेली आहे. बाकी प्रकरणे प्रलंबित आहेत.


१११ गावांमधील ८०४ कुटुंब बाधित


अतिवृष्टीमुळे विभागात अमरावती जिल्ह्यातील १११ गावे व ८०४ कुटुंब बाधित झाली. याची २,५५८ नागरिकांना झळ पोहोचली आहे. ४७५ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. आपत्तीमध्ये १४ व्यक्ती जखमी झाल्या. याशिवाय दुधाळ ३५, लहान ४८, ओढकाम करणारी ३१ जनावरे मृत झालेली आहेत.


१,४०८ घरांचे नुकसान


अतिवृष्टीमुळे ३० घरांची पूर्णत: पडझड, १३९ घरांची अंशत:, १,२३९ कच्च्या घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय ४२ गोठ्यांची देखील पडझड झालेली आहे. या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे अद्याप सानुग्रह अनुदान देण्यात आलेले नाही. आपत्तीमुळे अमरावती जिल्ह्यात २.५० लाखांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०