मुंबईत पावसाची रिपरिप

मुंबई : मुंबईमध्ये आज सोमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. राज्यात दिवसभर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेध शाळेकडून वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत १४ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. त्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा, मदतकार्य, बचाव पथके सज्ज झाली आहेत.


मुंबईला रविवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे रविवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र रविवारी संपूर्ण दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर सोमवारी पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरू आहे.


आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत (मागील २४ तासांत) सांताक्रूझमध्ये ९.२ मि.मी., तर कुलाब्यात ११.७ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. सकाळी ८.३० पासून ते १०.३० पर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांत ठिकठिकाणी ०.१ मि.मी. ते ५ मि.मी. दरम्यान पावसाची नोंद झाली. केवळ शीव परिसरात ५ मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.


गेल्या २४ तासांमध्ये (सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावात २६ मि.मी., तुळशीमध्ये ४३ मि. मी, मध्य वैतरणामध्ये ८९ मि.मी, तानसामध्ये ६८ मि.मी., अप्पर वैतरणामध्ये ८८ मि.मी., भातसामध्ये ८९ मि.मी, मोडकसागरमध्ये ७३ मि. मी पावसाची नोंद झाली.

Comments
Add Comment

मिनिटांत पार्सल पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरमागे किती पैसे मिळतात ? जाणून घ्या वास्तव

मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डिलिव्हरी ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. Zepto, Zomato, Amazon, Myntra यांसारख्या

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी म्हणजे असे व्यक्तिमत्व जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या