'आरे आंदोलन' प्रकरणी आदित्य ठाकरेंना राष्ट्रीय बालहक्क आयोगाची नोटीस

  116

मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेडच्या विरोधात काल आंदोलन केले होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती पण आदित्य ठाकरे यांना हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या आंदोलनात लहान मुले पोस्टर घेऊन सहभागी होते यामुळे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


आरे कारशेडच्या विरोधातील आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी नियमांची पायमल्ली केली आहे अशी तक्रार एका संस्थेने केली असून त्यानंतर ठाकरेंना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान काल 'आरे बचाव' हे आरे येथील जंगल वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केलं होतं. यामध्ये अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात लहान मुलांना सहभागी होण्याची परवानगी नसताना लहान मुलांचा या आंदोलनात सहभाग होता.


यावर सह्याद्री राईट्स या संस्थेने आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिस आणि राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केल्यावर बालहक्क आयोगाकडून मुंबई पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी तीन दिवसांत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना या नोटीसीत देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका