शिवसेनेचे १४ खासदारही बंडाच्या तयारीत

Share

मुंबई : शिवसेनेतील ४० आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदारही एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची दाट शक्यता आहे. तर पुढील आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची शिवसेना पक्षप्रमुखांकडे मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी ठाकरे यांना पत्र लिहून मुर्मू यांना पक्षाने पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली आहे.

मिळालेल्या बातमीनुसार भाजपबरोबर सत्ता स्थापन करावी यासाठी शिवसेनेचे १४ खासदार बंडाच्या तयारीत आहेत. त्यासाठी १३ किंवा १४ जुलै रोजी हे खासदार वेगळा गट म्हणून मान्यता द्यावी यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी करणार आहेत.

याआधी शिवसेनेतील १५ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात प्रसार माध्यमांनी लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठोस काही सांगितले नाही. तथापि, अनेक खासदार भाजपसोबत जाण्याची मागणी करत होते. ज्यांच्याविरोधात आपण लढलो, ते मजबूत होत आहेत. आपण मात्र कमकुवत झालोय, अशी खंत खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

दरम्यान, सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ही बैठक दुपारी १२ वाजता होणार आहे. ते म्हणाले, “या बैठकीचा अजेंडा हा १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करणे असेल.” याआधी शिवसेनेच्या काही खासदारांनी पक्ष नेतृत्वाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यास सांगितले होते.

यापूर्वी शिवसेनेने एनडीएशी संबंध तोडून प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी या दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.

Recent Posts

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

10 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

41 minutes ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

6 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

8 hours ago