गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या ३२५ बसेसचे नियोजन

विरार (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाच्या वर्षीही राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जवळपास ३२५ गाड्या सोडण्याचे नियोजन पालघर एसटी महामंडळाकडून करण्यात आहे. यासाठी मागील आठवडाभरापासून प्रवासासाठीचे आरक्षण सुरू केले आहे.


गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण समजला जातो. कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने वसई-विरार मधून दर वर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी गावी जातात. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. या वर्षी ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी पालघर एसटी महामंडळानेही विशेष गाड्या सोडण्याच्या संदर्भात नियोजन सुरू केले आहे. यात वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून ३२५ गाड्या सोडण्यात येणार आहेत. यातील २०० गाड्या या सामूहिक आरक्षणासाठी तर इतर आरक्षणासाठी १२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.


गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट पासून गाड्यांचा प्रवास सुरू करण्यात येणार आहे. आठवडाभरापासून आरक्षण सुरू झाले आहे. सध्या आम्ही ३२५ गाड्यांचे नियोजन करून ठेवले आहे. जशा गाड्या आरक्षित होतील, त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल, असे पालघर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

राज्यात थंडी वाढणार! काही ठिकाणी तुरळक पावसाचाही अंदाज

मुंबई: नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. १ जानेवारीला कोकणात

महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती!

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : ‘महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्ती आहे’,

बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत आमदार शरद सोनावणे आणि

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. नरेंद्र जाधव यांच्या

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय, छत्रपती संभाजी महाराज समाधीसाठी अडीच एकर जमीन देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार मुंबई :