गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या ३२५ बसेसचे नियोजन

  70

विरार (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाच्या वर्षीही राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जवळपास ३२५ गाड्या सोडण्याचे नियोजन पालघर एसटी महामंडळाकडून करण्यात आहे. यासाठी मागील आठवडाभरापासून प्रवासासाठीचे आरक्षण सुरू केले आहे.


गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण समजला जातो. कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने वसई-विरार मधून दर वर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी गावी जातात. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. या वर्षी ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी पालघर एसटी महामंडळानेही विशेष गाड्या सोडण्याच्या संदर्भात नियोजन सुरू केले आहे. यात वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून ३२५ गाड्या सोडण्यात येणार आहेत. यातील २०० गाड्या या सामूहिक आरक्षणासाठी तर इतर आरक्षणासाठी १२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.


गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट पासून गाड्यांचा प्रवास सुरू करण्यात येणार आहे. आठवडाभरापासून आरक्षण सुरू झाले आहे. सध्या आम्ही ३२५ गाड्यांचे नियोजन करून ठेवले आहे. जशा गाड्या आरक्षित होतील, त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल, असे पालघर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,

मोठी बातमी : देवा विठ्ठला काय हे! पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता दौंड : आषाढी वारी (Ashadhi Wari 2025) हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण