विरार (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाच्या वर्षीही राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जवळपास ३२५ गाड्या सोडण्याचे नियोजन पालघर एसटी महामंडळाकडून करण्यात आहे. यासाठी मागील आठवडाभरापासून प्रवासासाठीचे आरक्षण सुरू केले आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण समजला जातो. कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने वसई-विरार मधून दर वर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी गावी जातात. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. या वर्षी ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी पालघर एसटी महामंडळानेही विशेष गाड्या सोडण्याच्या संदर्भात नियोजन सुरू केले आहे. यात वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून ३२५ गाड्या सोडण्यात येणार आहेत. यातील २०० गाड्या या सामूहिक आरक्षणासाठी तर इतर आरक्षणासाठी १२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट पासून गाड्यांचा प्रवास सुरू करण्यात येणार आहे. आठवडाभरापासून आरक्षण सुरू झाले आहे. सध्या आम्ही ३२५ गाड्यांचे नियोजन करून ठेवले आहे. जशा गाड्या आरक्षित होतील, त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल, असे पालघर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…