मेळघाटात आणखी एका विहिरीचे दूषित पाणी; सार्वजनिक आरोग्य धोक्यात

अमरावती (हिं.स.) : धारणी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या तातरा गावातील पाणी पुरवठा विहिरीत गावातील गल्लीचे व नाल्याचे पाणी जात असल्याने पाणी दूषित होऊन जलजन्य रोगांनी पाय रोवलेले आहे. तर ग्रामसेवक म्हणता ही योजना आमची नाही, आम्ही काय करावे, अशा स्थितीत तातराचे आदिवासी पेयजल संकटाचा सामना करत असल्याने एकच खळबळ माजलेली आहे.


धारणीपासून १५ कि. मी. अंतरावरील आणि गडगा मध्यम प्रकल्पाजवळ असलेल्या ग्राम तातरा येथील पाणीपुरवठाच्या विहिरीत गावाचे घाणपाणी तथा नाल्याच्या पुराचे पाणी पोहचत असल्याने विहीर चक्क विषारी झाल्याने आदिवासी घाबरलेले आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ता महेंद्रकुमार धांडे यांनी विस्तृत माहिती देताना सांगितले की, शासकीय विहिरीचे पाणी पिऊन गावात जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला असताना या बाबतीत ग्रामपंचायतने हात झटकलेले आहे. तातरा गाव हे गडगा मध्यम प्रकल्पाच्याजवळ असल्याने अनेक समस्यांना झुंज देत आहे. तलावाचे पाणी गावालगत भरत असल्यामुळे अनेक शेतातील पिके ओलाव्यामुळे नष्ट होतात तर डासांचा प्रादुर्भाव होत असतो.


पाणी पुरवठा योजनेची विहीर अगदी जमिनीला लागून बांधण्यात आल्याने पुराचे अथवा गावातील सांडपाणी पण विहीरीत जात असते. यामुळे शासकीय विहीरीचे पाणी दुषित झालेले आहे तर लवकरच विषारी होण्याचा धोका होऊ शकतो. पेयजलासाठी इतर स्त्रोत बरोबर नसल्याने या विषारी विहिरीतूनच पाणी आदिवासी भरतात आता मात्र, पाणी दूषित झाल्याने आदिवासी जवळच्या शेतातील सिंचन विहिरीतून पाणी आणत आहेत.


या विहिरीतील पाणी सुद्धा अशुद्धच आहे. याविषयी ग्रामपंचायतच्या सचिवाला माहिती दिली असता योजना आमची नाही, असे बेजबाबदार उत्तर मिळाल्याने ग्रामपंचायत विरुद्ध पण आदिवासी संतापलेले आहेत. मागील वर्षी सुद्धा विहिरीच्या बाबतीत अनेक तक्रारी होत्या. थातुर-मातुर दुरूस्ती करुन लोकांचे असंतोष शमविण्यात आला होता. यावर्षी सुद्धा तीच समस्या निर्माण झाल्याने तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण

धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव

सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली

बुलढाण्यात लाडकी बहीण योजेनचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका; सरकारची कडक कारवाई

बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा

पुणेकरांचा बोपदेव घाट वाहतुकीसाठी ७ दिवस बंद; वाहतुकीत होणार 'हे' बदल

पुणे : पुण्यातील वाहतुकीत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील पुणे - सासवड ला जोडणारा बोपदेव

इम्तियाज जलील यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांचा हल्ला

काळे झेंडे दाखवत नाराजांचा राडा छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून