बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रभारी सतीश अग्निहोत्रींची रेल्वेकडून हकालपट्टी

नवी दिल्ली : गैरव्यवहार प्रकरणी रेल्वेने नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएचएसआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. अग्निहोत्री सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रभारी होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अग्निहोत्री यांचा कार्यभार एनएचएसआरसीएल प्रकल्प संचालक राजेंद्र प्रसाद यांच्याकडे तीन महिन्यांसाठी देण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


एनएचएसआरसीएल हा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकार आणि भागीदार राज्यांचा संयुक्त उपक्रम आहे. ही मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे.


अधिकृत पदाचा गैरवापर आणि खासगी कंपनीकडं अनधिकृतपणे निधी हस्तांतरित करणं यासह अग्निहोत्रींवर अनेक आरोप आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ते म्हणाले, अग्निहोत्रींच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय लोकपाल न्यायालयाच्या २ जूनच्या आदेशानंतर आला आहे. या आदेशात एनएचएसआरसीएलच्या माजी एमडीनं एका खासगी कंपनीसोबत एकमेकांच्या फायद्यासाठी केलेल्या कथित कराराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले होते.


अग्निहोत्री यांनी रेल्वे विकास निगम लिमिटेडचे संचालक म्हणून नऊ वर्षांच्या कार्यकाळात ही कामं केल्याचा आरोप आहे. अग्निहोत्री यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत कोणताही गुन्हा करण्यात आला आहे की नाही हे शोधण्यासाठी लोकपाल न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिले होते. तसंच, चौकशी अहवाल सहा महिन्यांत किंवा १२ डिसेंबर २०२२ पूर्वी लोकपाल कार्यालयात सादर करावा, असे निर्देशांमध्ये म्हटले आहे.


अग्निहोत्री यांनी निवृत्तीनंतर वर्षभरातच एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केल्याचा आरोपही अधिकाऱ्यांनी केला आहे. हे सरकारी नियमांचे उल्लंघन आहे, जे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना केंद्राच्या परवानगीशिवाय सेवानिवृत्तीनंतर एक वर्षापूर्वी कोणतीही व्यावसायिक नियुक्ती स्वीकारण्यास प्रतिबंधित करते.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या