'संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता' विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन

नवी दिल्ली (हिं.स.) : संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील पहिल्या प्रदर्शनाचे आणि परिसंवादाचे नवी दिल्ली येथे सोमवारी ११ जुलै रोजी आयोजन होणार असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये सेवा, संशोधन संस्था, उद्योग आणि स्टार्ट-अप आणि नवोन्मेषकारांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विकसित केलेले उपाय प्रदर्शित करण्यात येतील आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उत्पादनांचा प्रारंभ करून ती उत्पादने बाजारात आणली जातील.


स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनिमित्त आयोजित उत्सवाचा एक भाग म्हणून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरता’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी, या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त असलेली नव्याने -विकसित कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ७५ उत्पादने/तंत्रज्ञान यांचा प्रारंभ केला जाईल अशी माहिती, या कार्यक्रमाबाबतच्या पत्रकार परिषदेत बोलताना संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांनी दिली. स्वयंचलन /मानवरहित रोबोटिक्स प्रणाली, सायबर सुरक्षा, मानवी वर्तन विश्लेषण,बुद्धिमत्ता निरीक्षण प्रणाली, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, भाषा /आवाज विश्लेषण आणि कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर आणि इंटेलिजन्स, पाळत ठेवणे आणि टेहळणी (सी4आयएसआर) प्रणाली आणि विश्लेषणात्मक माहिती या संबंधित उत्पादनांचा समावेश आहे. प्रारंभ करण्यात येणाऱ्या ७५ उत्पादनांव्यतिरिक्त, आणखी १०० उत्पादने विकासाच्या विविध टप्प्यात आहेत, असे त्यांनी सांगितले.


याशिवाय, या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रत्येकी दोन प्रमुख संरक्षण निर्यातदारांचा गौरव केला जाईल. या कार्यक्रमात सेवा, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्या सक्रिय सहभागासह.‘संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’, ‘अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय’ आणि ‘संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता – उद्योग दृष्टिकोन ’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय यावर विद्यार्थ्यांकडून उज्ज्वल नाविन्यपूर्ण कल्पना प्राप्त करण्यासाठी ‘जेननेक्स्ट एआय’ उपाययोजना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञांनी तयार केलेल्या पहिल्या तीन कल्पनांचाही गौरव केला जाणार आहे.

Comments
Add Comment

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर

अमेरिकेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमान उड्डाणांवर परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनचा व्यापक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील