मुंबईतील पाणी कपात १० टक्के नाही तर ३० टक्केच

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने १० टक्के अधिकृत पाणी कपात घोषित केली असली तरी मुंबईत अनेक ठिकाणी ३० टक्क्यांहून अधिक तर अनेक ठिकाणी डोंगराळ भागात पूर्णपणे पाणी कपात सुरु आहे. असा आरोप भाजपने केला आहे. मात्र याबाबत भाजप शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे.


दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने पालिकेने १० टक्के पाणी कपात केली आहे. मात्र ही पाणी कपात अधिकृत १० टक्के जरी असली तरी ३० टक्क्याहुन अधिक पाणी कपात असल्याचा आरोप भाजप ने केला असून याबाबत भाजपचे शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे.


यावेळी भाजपा नगरसेवक शिष्ठमंडळात गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेतली असून यावेळी पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली आहे. तर यावेळी नगरसेविका उज्वला मोडक, नगरसेवक अभिजित सामंत, कमलेश यादव, हरिष भांदिर्गे आदी उपस्थित होते.


मुंबई शहरात सुरु असलेल्या पाणी कपातीमुळे अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागत आहे. असा या गंभीर आरोप केला आहे. तर याबाबत उत्तर देताना महापालिका आयुक्तांनी पाणी समस्येबाबत आढावा घेऊन लवकरात लवकर मुंबईतील पाणी कपात रद्द करण्यात येईल असे आश्वासनही भाजपा शिष्ठमंडळाला दिले आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी