मुंबईतील पाणी कपात १० टक्के नाही तर ३० टक्केच

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने १० टक्के अधिकृत पाणी कपात घोषित केली असली तरी मुंबईत अनेक ठिकाणी ३० टक्क्यांहून अधिक तर अनेक ठिकाणी डोंगराळ भागात पूर्णपणे पाणी कपात सुरु आहे. असा आरोप भाजपने केला आहे. मात्र याबाबत भाजप शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे.


दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने पालिकेने १० टक्के पाणी कपात केली आहे. मात्र ही पाणी कपात अधिकृत १० टक्के जरी असली तरी ३० टक्क्याहुन अधिक पाणी कपात असल्याचा आरोप भाजप ने केला असून याबाबत भाजपचे शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे.


यावेळी भाजपा नगरसेवक शिष्ठमंडळात गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेतली असून यावेळी पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली आहे. तर यावेळी नगरसेविका उज्वला मोडक, नगरसेवक अभिजित सामंत, कमलेश यादव, हरिष भांदिर्गे आदी उपस्थित होते.


मुंबई शहरात सुरु असलेल्या पाणी कपातीमुळे अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागत आहे. असा या गंभीर आरोप केला आहे. तर याबाबत उत्तर देताना महापालिका आयुक्तांनी पाणी समस्येबाबत आढावा घेऊन लवकरात लवकर मुंबईतील पाणी कपात रद्द करण्यात येईल असे आश्वासनही भाजपा शिष्ठमंडळाला दिले आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा