मुंबईतील पाणी कपात १० टक्के नाही तर ३० टक्केच

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने १० टक्के अधिकृत पाणी कपात घोषित केली असली तरी मुंबईत अनेक ठिकाणी ३० टक्क्यांहून अधिक तर अनेक ठिकाणी डोंगराळ भागात पूर्णपणे पाणी कपात सुरु आहे. असा आरोप भाजपने केला आहे. मात्र याबाबत भाजप शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे.


दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने पालिकेने १० टक्के पाणी कपात केली आहे. मात्र ही पाणी कपात अधिकृत १० टक्के जरी असली तरी ३० टक्क्याहुन अधिक पाणी कपात असल्याचा आरोप भाजप ने केला असून याबाबत भाजपचे शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे.


यावेळी भाजपा नगरसेवक शिष्ठमंडळात गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेतली असून यावेळी पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली आहे. तर यावेळी नगरसेविका उज्वला मोडक, नगरसेवक अभिजित सामंत, कमलेश यादव, हरिष भांदिर्गे आदी उपस्थित होते.


मुंबई शहरात सुरु असलेल्या पाणी कपातीमुळे अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागत आहे. असा या गंभीर आरोप केला आहे. तर याबाबत उत्तर देताना महापालिका आयुक्तांनी पाणी समस्येबाबत आढावा घेऊन लवकरात लवकर मुंबईतील पाणी कपात रद्द करण्यात येईल असे आश्वासनही भाजपा शिष्ठमंडळाला दिले आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत