दहिसरच्या खदानीत दोघे बुडाले, एकाचा मृतदेह सापडला, दुसरा बेपत्ता

  35

मुंबई : पश्चिम उपनगरातील दहिसर येथील खदानीत दोन जण बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अजय जोगदंड आणि शेखर विश्वकर्मा अशी त्या दोघांची नावे आहेत. दरम्यान शेखरचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत अजयचा शोध लागला नव्हता.


मिळालेल्या माहितीनुसार अजय जोगदंड आणि शेखर विश्वकर्मा हे दोघेही गोराईचे रहिवासी होते. ते दोघे जण त्यांच्या पाच मित्रांसोबत खदानीत पोहण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते सातही जण बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. स्थानिकांनी तातडीने याची माहिती दहिसर पोलिसांना दिली. थोड्या वेळात दहिसर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल आले. या घटनेची माहिती समजताच परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे हेही घटनास्थळी आले. अग्निशमन दलाने शोध मोहीम सुरू करून पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. तर खदानीत बुडालेल्या अक्षय आणि शेखरचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान रात्री शेखरला बाहेर काढण्यात आले आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर रात्री उशिरापर्यंत अक्षयचा शोध सुरू होता.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका