दहिसरच्या खदानीत दोघे बुडाले, एकाचा मृतदेह सापडला, दुसरा बेपत्ता

मुंबई : पश्चिम उपनगरातील दहिसर येथील खदानीत दोन जण बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अजय जोगदंड आणि शेखर विश्वकर्मा अशी त्या दोघांची नावे आहेत. दरम्यान शेखरचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत अजयचा शोध लागला नव्हता.


मिळालेल्या माहितीनुसार अजय जोगदंड आणि शेखर विश्वकर्मा हे दोघेही गोराईचे रहिवासी होते. ते दोघे जण त्यांच्या पाच मित्रांसोबत खदानीत पोहण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते सातही जण बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. स्थानिकांनी तातडीने याची माहिती दहिसर पोलिसांना दिली. थोड्या वेळात दहिसर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल आले. या घटनेची माहिती समजताच परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे हेही घटनास्थळी आले. अग्निशमन दलाने शोध मोहीम सुरू करून पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. तर खदानीत बुडालेल्या अक्षय आणि शेखरचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान रात्री शेखरला बाहेर काढण्यात आले आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर रात्री उशिरापर्यंत अक्षयचा शोध सुरू होता.

Comments
Add Comment

Mumbai HC Voting List : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; मतदार यादी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या!

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government Bodies) निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज

...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६

भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात