चुनाभट्टी भागात दरड कोसळली, घरांचे नुकसान

मुंबई : सततच्या पावसामुळे चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील डोंगराचा काही भाग आज सकाळी घरांवर कोसळला. घटनेबाबत माहिती मिळताच चेंबूर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तत्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आले असून तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तिघेही जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास डोंगराचा काही भाग लागून असणाऱ्या घरांवर कोसळला आणि ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले आहे.


दरम्यान, कालही घाटकोपर येथे दरड कोसळली होती. मुंबईच्या घाटकोपर भागात खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे मोठे नुकसान झाले.


घाटकोपरमध्ये ज्यावेळी घरावर दरड कोसळली, त्यावेळी त्या घरात राहणारे संतोष उपाले आणि त्यांचं कुटुंब असे पाच जण घरात होते. अचानक आवाज झाला आणि दरडीसह एक मोठे झाड घरावर कोसळले. भयभीत होऊन संपूर्ण कुटुंब जीव मुठीत घेऊन बाहेर पळाले. जीव वाचला, मात्र घराचे आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. झाड आणि दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

Comments
Add Comment

महानगरपालिका निवडणूक; आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई

Prasad Lad : "नारायण राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत, ते आमची ऊर्जा!" प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर त्यांचे निकटवर्तीय आणि भाजप

Tata Hospital Bomb Threat : परळच्या टाटा रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रुग्णालय परिसर रिकामा

बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल मुंबई : मुंबईतील परळ भागात असलेल्या जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील