वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी धवनकडे भारताचे नेतृत्व

  101

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ जुलै महिन्याच्या शेवटी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि यजमान वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाणार आहे.


एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. शिखर धवनकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. येत्या २२ जुलै २०२२ पासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. २४ जुलै दुसरा आणि २७ जुलैला तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. त्यानंतर २९ जुलैला पहिला टी-२० सामना होणार आहे. तर १ ऑगस्टला दुसरा, २ ऑगस्टला तिसरा, ६ ऑगस्टला चौथा आणि ७ ऑगस्टला पाचवा टी-२० सामना होणार आहे.


वेस्टइंडीजविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ :


शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र