वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी धवनकडे भारताचे नेतृत्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ जुलै महिन्याच्या शेवटी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि यजमान वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाणार आहे.


एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. शिखर धवनकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. येत्या २२ जुलै २०२२ पासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. २४ जुलै दुसरा आणि २७ जुलैला तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. त्यानंतर २९ जुलैला पहिला टी-२० सामना होणार आहे. तर १ ऑगस्टला दुसरा, २ ऑगस्टला तिसरा, ६ ऑगस्टला चौथा आणि ७ ऑगस्टला पाचवा टी-२० सामना होणार आहे.


वेस्टइंडीजविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ :


शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

Comments
Add Comment

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा