वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी धवनकडे भारताचे नेतृत्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ जुलै महिन्याच्या शेवटी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि यजमान वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाणार आहे.


एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. शिखर धवनकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. येत्या २२ जुलै २०२२ पासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. २४ जुलै दुसरा आणि २७ जुलैला तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. त्यानंतर २९ जुलैला पहिला टी-२० सामना होणार आहे. तर १ ऑगस्टला दुसरा, २ ऑगस्टला तिसरा, ६ ऑगस्टला चौथा आणि ७ ऑगस्टला पाचवा टी-२० सामना होणार आहे.


वेस्टइंडीजविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ :


शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय