मुंबई (प्रतिनिधी) : रविवारीच्या ५६ चा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) नुसार मुंबईतील हवेचा दर्जा ‘चांगल्या’वरून ‘समाधानकारक’ श्रेणीत आला आहे. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) च्या आकडेवारीनुसार शुक्रवारी शहराचा एक्युआय १० होता. जो २०१५ मध्ये देखरेख सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात कमी आहे.
सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च नुसार, मुंबईचा एक्युआय पुढील दोन दिवस ‘समाधानकारक’ श्रेणीत राहील. तथापि, रविवारी शहराने जूनच्या मध्यानंतर प्रथमच ५० एअर क्वालिटी इंडेक्सचा टप्पा ओलांडला.
रविवारी एक्युआय वाढण्याचे कारण स्पष्ट करताना, सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या प्रकल्प संचालक गुफ्रान बेग म्हणाले की, “विशिष्ट क्षेत्राच्या एक्युआय वर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. परंतु, वाऱ्याचा वेग हा मुख्य घटकांपैकी एक आहे; विशेषतः मुंबईसारख्या भौगोलिक प्रदेशासाठी जो तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. मुंबईसाठी एक्युआय मधील वाढ आणि घट हे मुख्यत्वे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते जे शुक्रवारी जास्त होते आणि रविवारी कमी होते. परिणामी संपूर्ण शहरात हवेच्या गुणवत्तेत वाढ आणि घट होते, असेही ते म्हणाले.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…