Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts) मोठा बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. रतन टाटा यांचे एकेकाळचे जवळचे विश्वासू मानले जाणारे मेहली मिस्त्री यांचा टाटा धर्मादाय संस्थांमधील कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहली मिस्त्री यांचा कार्यकाळ नूतनीकरण (Renewal) करण्यास ट्रस्टच्या नेतृत्वाने नकार दिला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन आणि विश्वस्त विजय सिंग यांनी मिस्त्री यांच्या कार्यकाळाचे नूतनीकरण करण्यास मान्यता देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे मेहली मिस्त्री यांना टाटा समूहाच्या सर्वोच्च धर्मादाय संस्थांमधून बाहेर पडावे लागणार आहे. टाटा धर्मादाय संस्थांशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नकाराने मेहली मिस्त्री यांचा ट्रस्ट्समधील कार्यकाळ प्रभावीपणे संपला आहे. रतन टाटा यांच्या काळात मेहली मिस्त्री यांचे स्थान महत्त्वाचे मानले जात होते, मात्र आता झालेल्या या मोठ्या फेरबदलामुळे टाटा ट्रस्टच्या अंतर्गत रचनेत महत्त्वाचे बदल झाल्याचे स्पष्ट होत आहे.



रतन टाटांचे विश्वासू मेहली मिस्त्रींना 'आउट'


टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्था (Tata Trusts) मध्ये आता मोठे बदल होताना दिसत आहेत. एकेकाळी उद्योगपती रतन टाटा यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे मेहली मिस्त्री यांना ट्रस्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिस्त्री यांच्या कार्यकाळ वाढवण्याच्या प्रस्तावाला ट्रस्टच्या नेतृत्वाने स्पष्ट नकार दिला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन आणि विश्वस्त विजय सिंग यांनी मिस्त्रींच्या कार्यकाळ नूतनीकरणाला मान्यता दिली नाही. ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय बहुमताने घेण्यात आल्याचे समजते. मिस्त्री यांच्या कार्यकाळ वाढवण्याच्या बाजूने विश्वस्त दारायस खंबाटा, प्रमित झवेरी आणि जहांगीर जहांगीर यांनी मत दिले असले तरी, बहुमताने घेतलेल्या निर्णयामुळे मिस्त्री यांचे टाटा ट्रस्टमधील भवितव्य आता निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे मेहली मिस्त्री यांची ट्रस्टच्या सदस्यत्वातून हकालपट्टी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




बहुमताने मेहली मिस्त्रींची हकालपट्टी


रतन टाटा यांचे एकेकाळचे जवळचे मानले जाणारे मेहली मिस्त्री यांना टाटा समूहाच्या महत्त्वाच्या दोन धर्मादाय संस्थांमधून (ट्रस्ट्स) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ट्रस्टच्या नेतृत्वाने बहुमताने हा निर्णय घेतला आहे. या ट्रस्टमध्ये नोएल टाटा (अध्यक्ष), वेणू श्रीनिवासन (उपाध्यक्ष), विजय सिंग, मेहली मिस्त्री, प्रमित झवेरी आणि दारियस खंबाटा हे विश्वस्त आहेत. मेहली मिस्त्री स्वतःच्या कार्यकाळावर मतदान करू शकत नसल्यामुळे, नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांनी मिस्त्रींच्या विरोधात मतदान करून हा निर्णय बहुमताने घेतला. SRTT मध्ये नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन, विजय सिंग, जिमी टाटा, जहांगीर एचसी जहांगीर, मेहली मिस्त्री आणि दारियस खंबाटा हे विश्वस्त आहेत. जिमी टाटा सहसा ट्रस्टच्या चर्चांमध्ये भाग घेत नाहीत. त्यामुळे या ठिकाणीही नेतृत्वाने बहुमताच्या जोरावर मिस्त्रींचा कार्यकाळ नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्त्री यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ नूतनीकरण (Renewal) करण्याचा ठराव टाटा ट्रस्टचे सीईओ सिद्धार्थ शर्मा यांनी गेल्या शुक्रवारी मांडला होता. यावर ट्रस्टच्या तिन्ही विश्वस्तांनी (नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन, विजय सिंग) गुरुवारी रात्री उशिरा आणि शुक्रवारी सकाळी आपला निर्णय कळवला, ज्यामुळे मिस्त्रींच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब झाले. या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात मोठी आणि विडंबनात्मक गोष्ट म्हणजे, मिस्त्री यांची हकालपट्टी त्याच ऑक्टोबर महिन्यात झाली आहे, ज्या महिन्यात त्यांचे चुलत भाऊ सायरस मिस्त्री यांना २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून नाटकीयरीत्या काढून टाकण्यात आले होते.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गमध्ये 'रिव्हर्स मायग्रेशन'साठी मंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या मेहनतीला फळ; पहिला पंचतारांकित हॉटेल प्रकल्प दृष्टिपथात

 सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोनेरी दिवस मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासह स्थानिक

Sachin Ahir : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; ५० वर्षांच्या मागणीला गती

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यासाठी विधान भवनात उपसभापती सचिन अहिर

Eknath Shinde : सरकारी रुग्णालयांमध्ये हलगर्जीपणा चालणार नाही! स्वच्छता, आहार आणि औषधांच्या दर्जावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कडक निर्देश

सरकारी रुग्णालयांची विश्वासार्हता आणखी वाढवा स्वच्छता, रुग्णांचा आहार, औषधांचा दर्जा यावर तडजोड चालणार

Devendra Fadnavis : मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार, मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास मंजुरी

मुंबई : मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच

BHMS Doctors : बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी बंद, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत स्थगिती; वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : राज्यातील बीएचएमएस डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

ED Raid : ₹10 हजार कोटींच्या कथित पॉन्झी घोटाळ्याने खळबळ; ED ची मोठी कारवाई! मुंबई-भोपाळमध्ये छापे, ₹30 कोटींची मालमत्ता गोठवली

Mumbai : मुंबई आणि भोपाळमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या मोठ्या कारवाईमुळे कथित 10 हजार कोटी रुपयांच्या सागा