बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू

नाशिक (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या धुमोडी येथे बिबट्याने ७ वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून फरपटत जंगलात नेल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


शेतमजुरी करणाऱ्या एकनाथ लखमा वाघ याची ७ वर्षीय मुलगी रुचिता उर्फ रूचा सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराबाहेर रस्त्यावर खेळत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवून तिला फरपटत नेले ही घटना ग्रामस्थांना कळताच तेथे आरडाओरडा सुरू झाला.


ही बातमी लगेचच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला कळताच दोन्ही विभागाच्या तुकड्या तेथे दाखल झाल्या. त्यांनी ग्रामस्थ, इको टीमच्या सदस्यांच्या मदतीने शोध कार्य सुरू करून रात्री ११ वाजेच्या सुमारास मुलीचा मृतदेह धुमोडी शिवारातील पंचायती जुना आखाडा येथील करवंदीच्या झाडीत अर्धवट खाल्लेले अवस्थेत आढळून आला.


यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रभान जाधव, सचिन गवळी, कैलास अहिरे, सचिन गांगुर्डे, वनअधिकारी विवेक भदाणे, बोकडे, शिंदे, जगताप, इको टीम चे वैभव भोगले, अभिजीत महाले, सरपंच शांताराम आहेर, निवृत्ती बोडके, मनोहर उदार, कैलास आहेर, केरू आहेर आदींनी मुलीचा मृतदेह शोधण्यासाठी मदत कार्य केले. दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये