बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू

नाशिक (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या धुमोडी येथे बिबट्याने ७ वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून फरपटत जंगलात नेल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


शेतमजुरी करणाऱ्या एकनाथ लखमा वाघ याची ७ वर्षीय मुलगी रुचिता उर्फ रूचा सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराबाहेर रस्त्यावर खेळत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवून तिला फरपटत नेले ही घटना ग्रामस्थांना कळताच तेथे आरडाओरडा सुरू झाला.


ही बातमी लगेचच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला कळताच दोन्ही विभागाच्या तुकड्या तेथे दाखल झाल्या. त्यांनी ग्रामस्थ, इको टीमच्या सदस्यांच्या मदतीने शोध कार्य सुरू करून रात्री ११ वाजेच्या सुमारास मुलीचा मृतदेह धुमोडी शिवारातील पंचायती जुना आखाडा येथील करवंदीच्या झाडीत अर्धवट खाल्लेले अवस्थेत आढळून आला.


यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रभान जाधव, सचिन गवळी, कैलास अहिरे, सचिन गांगुर्डे, वनअधिकारी विवेक भदाणे, बोकडे, शिंदे, जगताप, इको टीम चे वैभव भोगले, अभिजीत महाले, सरपंच शांताराम आहेर, निवृत्ती बोडके, मनोहर उदार, कैलास आहेर, केरू आहेर आदींनी मुलीचा मृतदेह शोधण्यासाठी मदत कार्य केले. दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका