अदृश्य हातांचेही आभार

Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. याकरिता ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष मदत केली त्यांचे आणि अदृश्यपणे मदत केली, त्यांचेही आभार, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बहुमत चाचणीवेळी १६४ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यावेळी भाजप आणि शिंदेसेनेतील सर्व आमदारांनी त्यांचे अभिनंदन केले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाच्या प्रस्तावाचे भाषण केले. एकनाथ शिंदे यांच्या निष्ठेचे तसेच त्यांच्या संघटनकौशल्याचे आणि जनतेप्रती सेवाव्रती असण्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले. यासोबतच उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस यांना ज्यांनी ज्यांनी टोमणे मारले, त्या सर्वांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

सभागृहाबाहेर राहून हा प्रस्ताव मंजूर करण्यात ज्यांनी मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी आभार मानतो, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे विजय वडट्टीवार, आणि चव्हाण यांचे नाव उच्चारले… ते म्हणाले, वडेट्टीवार साहेब, चव्हाण साहेब.. आभार तर मानलेच पाहिजेत..’ एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे असे उघड दिसतेच आहे. मात्र अजूनही काही अदृश्य शक्तींचा या कारस्थानात सहभाग आहे. यात काँग्रेसही सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे हा टोला काँग्रेसला होता की काय, अशी चर्चा सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या भाषणात एकनाथ शिंदेंचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाल, ‘एकनाथ शिंदे हे एक वेगळं रसायन आहे. २४X७ काम करणारा हा नेता आहे. निवडणूक असते, क्राईसिस असतो तेव्हा ७२X२१ असे तिहेरी वेळा काम करताना हा नेता दिसतो. एकनाथ शिंदेंमध्ये प्रचंड माणुसकी आहे. सगळ्यांसाठी धावून जाणे, ही शिकवण धर्मवीर आनंद दिघे यांनी दिली. ज्याचा कुणी नाही, त्याचे दिघे साहेब होते. याच शिकवणीमुळे सामान्य माणसासाठी काम करताना शिंदेसाहेब दिसतात.’

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा येईन, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होता आले नाही. त्यानंतर त्यांच्या मी पुन्हा येईन.. या वाक्यावरून नेहमीच टिंगल उडवली गेली. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो… ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते.

Recent Posts

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

14 minutes ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

27 minutes ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

1 hour ago

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

3 hours ago