लक्ष्मणकडे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी

लंडन (वृत्तसंस्था) : कसोटी मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. ७ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात व्ही.व्ही.एस लक्ष्मणकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


भारतीय संघाचे नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी संघाचा भाग आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामना ५ जुलैपर्यंत खेळला जाणार आहे आणि कसोटी संघाशी जोडलेले काही खेळाडू आणि स्टाफ पहिल्या टी-२० सामन्यासाठी उपलब्ध नसतील. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.


यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आयर्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघाने २-० अशा फरकाने आयर्लंडचा पराभव केला होता.

Comments
Add Comment

कसोटी सामन्यानंतर लगेचच भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका! दक्षिण आफ्रिकेच्या संघात होणार अनेक खेळाडूंचे पुनरागमन

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून गुवाहाटीमध्ये सुरूवात होणार आहे.

टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना

IND vs BAN: भारताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाला कॅप्टन

दोहा : भारताचा (भारत अ) आशिया कप रायझिंग कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. हा सामना जिंकून

शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर! 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ईडन गार्डनवर झालेल्या

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

आज भारत-बांगलादेश सामना; टॉस, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग अपडेट

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना २१नोव्हेंबर रोजी