लक्ष्मणकडे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी

  75

लंडन (वृत्तसंस्था) : कसोटी मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. ७ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात व्ही.व्ही.एस लक्ष्मणकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


भारतीय संघाचे नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी संघाचा भाग आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामना ५ जुलैपर्यंत खेळला जाणार आहे आणि कसोटी संघाशी जोडलेले काही खेळाडू आणि स्टाफ पहिल्या टी-२० सामन्यासाठी उपलब्ध नसतील. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.


यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आयर्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघाने २-० अशा फरकाने आयर्लंडचा पराभव केला होता.

Comments
Add Comment

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला

WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप