लक्ष्मणकडे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी

  77

लंडन (वृत्तसंस्था) : कसोटी मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. ७ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात व्ही.व्ही.एस लक्ष्मणकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


भारतीय संघाचे नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी संघाचा भाग आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामना ५ जुलैपर्यंत खेळला जाणार आहे आणि कसोटी संघाशी जोडलेले काही खेळाडू आणि स्टाफ पहिल्या टी-२० सामन्यासाठी उपलब्ध नसतील. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.


यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आयर्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघाने २-० अशा फरकाने आयर्लंडचा पराभव केला होता.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये