वांद्रे टर्मिनस-खार रोड दरम्यान पादचारी पूल

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि वाढीची कामे यशस्वीपणे हाती घेतली आहेत. याच्याच पुढे जाऊन, वांद्रे टर्मिनसवरून येणाऱ्या आणि निघणाऱ्या बाहेरच्या गाड्यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी, खार रोड स्थानकपासून ते वांद्रे टर्मिनस आणि उपनगरीय नेटवर्कला जोडणारा नवीन पादचारी पूल कार्यान्वित केला आहे.


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, १ जुलै २०२२ पासून वांद्रे टर्मिनस आणि खार रोडदरम्यान नवीन पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आला आहे. या नवीन पादचारी पुलाची लांबी ४.४ मीटर रुंद आणि ३१४ मीटर अशी आहे.


या नवीन पादचारी पुलाचा उपयोग बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे. प्रवासी खार रोड स्टेशनवर उतरून आणि पादचारी पुलाशी जोडलेले खार स्थानाकावरून वांद्रे टर्मिनसच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पोहोचू शकतात. या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात एकूण सात पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल