'संगीत कारंजे' सांगणार नागपूरचा इतिहास -नितीन गडकरी

नागपूर (हिं.स.) : नागपूरच्या प्रसिद्ध फुटाळा तलावात असणारे संगीत कारंजे नागपूरचा इतिहास सांगणार असून या इतिहासाची हिंदी मधली कॉमेंट्री अमिताभ बच्चन आणि मराठीतली कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्या आवाजात राहील अशी माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो प्रकल्पाची उद्घाटनापूर्वी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांसह पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते निधी मधून ३० कोटी रुपये पंजाबराव कृषी विद्यापीठाला देण्यात आले असून फुटाळ्याजवळील विद्यापीठ उद्यानात देश-विदेशातील पुष्पांच्या जाती आणून येथील पुष्पविविधता वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


विशेष म्हणजे हे कारंजे पाहण्यासाठी फुटाळा तलावाजवळ दर्शक गॅलरी ही ४०० आसन क्षमतेची राहणार असून फुटाळ्याच्या पुढेच बारा मजली फूड-प्लाझा ११०० वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह उभारण्यात येणार आहेत. या कारंजाच्या निर्मिती साठी विश्वस्तरावरील आर्किटेक्ट नागपूरात आले असून फाऊंटनच्या हार्डवेअरची प्राथामिक चाचणी आज गडकरी यांनी बघितली आणि पाहणी केली. या फाऊंटेनच्या निर्मितीसाठी हातभार लावणारे नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो तसेच या प्रकल्पाचे कंत्राटदार यांचेही आभार गडकरी यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित तामिळ चित्रपट क्षेत्रातील गायिका रेवती यांनी सुद्धा या प्रकल्पाच्या संगीत नियोजना विषयी माहिती दिली.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये