भारतीय महिलांची विजयी सुरुवात

पल्लेकेले (वृत्तसंस्था) : दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या संयमी फलंदाजीमुळे भारतीय महिलांनी यजमान श्रीलंकेवर ४ विकेट राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात विजयाने केली. भारतीय संघाची गोलंदाजी विजयात महत्त्वाची ठरली.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचे दोन फलंदाज स्वस्तात परतले. खराब सुरुवात होऊनही शफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या जोडीने चांगली फलंदाजी करत भारताची गाडी प्लॅटफॉर्मवर आणली. शफालीने हरमनप्रीतची साथ अर्धवट सोडली. त्यानंतर हरमनप्रीत आणि हर्लीन देओल या जोडगोळीने भारताची धावसंख्या शतकापार नेली. हरमनप्रीतने ४४, तर हर्लीनने ३४ धावा करत भारताला विजयासमीप नेले.


शेवटी दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकार या जोडीने नाबाद खेळी खेळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ३८ षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १७६ धावा ठोकत विजयी लक्ष्य गाठले. भारताने ४ विकेट आणि ७२ चेंडूं राखून सहज विजय मिळवला. या सामन्यातील विजयामुळे भारताने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर पारितोषिकाने गौरविण्यात आले.


टी-२० मालिका जिंकणाऱ्या भारतीय महिलांनी शुक्रवारी एकदिवसीय मालिकेची सुरुवात दमदार केली. पाहुण्या संघाने यजमान श्रीलंकेला मालिकेतील पहिल्या सामन्यात सहज नमवले. दीप्ती शर्मा, रेणुका सिंह आणि पूजा वस्त्राकर या गोलंदाजांच्या तिकडीने श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. ४०.२ षटकांत त्यांचा संघ १७१ धावांवर सर्वबाद झाला. विशेष म्हणजे या सामन्यात भारताने ८ गोलंदाज वापरले. त्यापैकी दीप्ती शर्मा, रेणुका सिंह आणि पूजा वस्त्राकर यांनी अनुक्रमे ३, ३, २ बळी मिळवले.


विशेष म्हणजे कर्णधार हरमनप्रीत कौरने ७ षटके फेकून केवळ १३ धावा देत १ बळी मिळवला. भारताच्या या अप्रतिम गोलंदाजीमुळे श्रीलंकेला अवघ्या १७१ धावाच जमवता आल्या. त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाज निलाक्षी डी सिल्वाने संघातर्फे सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्या पाठोपाठ हसीनी पेरेराने ३७ आणि हर्षीथा समराविक्रमाने २८ धावा केल्या. यजमानांचे अन्य फलंदाज अपयशी ठरले.

Comments
Add Comment

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

ट्रम्पच्या सतत बदलत्या धोरणामुळे आणि अव्यावहारिक अशा निर्णयांमुळे रखडला अमेरिका - भारत मुक्त व्यापार करार

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सतत बदलत्या धोरणामुळे आणि अव्यावहारिक अशा निर्णयांमुळे

'ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला मिळालेले मोठे यश, पाकिस्तानने युद्धबंदीची केलेली विनंती', स्विस थिंक टँकचा खुलासा

बर्न : सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHPM) या स्विस मिलिटरी थिंक टँकने ४७ पानांचा अहवाल

चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प

वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर

चीनची लोकसंख्या वर्षभरात ४० लाखांनी घटली; वृद्धांची संख्या वाढली

बँकॉक : कुटुंबनियोजनासारख्या योजना राबविल्याने आता चीनसमोर लोकसंख्येबाबत नवेच संकट उभे राहिले आहे. सरकारी

पाकिस्तानात लग्नमंडपात आत्मघाती हल्ला; ७ ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत ७