उपनगरीय रेल्वेस्थानकावरील सरकत्या जिन्यांमध्ये होणार वाढ

Share

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील काही स्थानकांमधील सरकत्या जिन्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या सुविधेमुळे गरोदर महिला, ज्येष्ठ प्रवाशांना स्थानकात पोहचणे आणि बाहेर पडणे सोपे होणार आहे. दरम्यान, मार्च २०२३ पर्यंत आणखी ८६ सरकत्या जिन्यांची भर पडणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे. मधल्या काळात स्थानकातील गर्दी विभाजनासाठी नव्या पादचारी पुलांची भर रेल्वे प्रशासनाकडून घालण्यात आली. मात्र तरीही रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात आणि ज्येष्ठ, गरोदर महिलांना पादचारी पुलावर चढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने स्थानकात नवे सरकते जिने आणि उद्वाहक बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये सर्वाधिक सरकते जिने मध्य रेल्वेवर बसवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रत्येक सरकत्या जिन्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये एवढी असून रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला स्थानकांमध्ये १०१ सरकते जिने बसवण्याची मंजुरी दिली आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांमध्ये १०१ पैकी ३३ जिने बसवण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर ८६ सरकते जिने आहेत.

मध्य रेल्वेवरील कांजुरमार्ग, ठाकुर्ली, भायखळा, मुलुंड, मुंब्रा आणि इगतपुरी (प्रत्येकी दोन जिने) आणि आंबिवली (एक) तर पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी, वांद्रे टर्मिनस, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसर, वसई रोड, सफाळे, वानगाव स्थानकात सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

19 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

19 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

21 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

34 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

38 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago