साईनाथांचा जीवन संदेश

Share

एकदा साईनाथांनी वांद्र्याच्या बाळाराम मानकरांना तपकरायला एकदा मच्छिंद्रगडावर पाठविले. त्यांनी तेथे वास्तव्य करून अविरत तपाचरण केले. ते ध्यानमग्न अवस्थेत असताना श्रीबाबांनी त्यांना अनेकदा दर्शन दिले असता त्यांनी विचारले, “बाबा, तुम्ही मला या ठिकाणी का पाठविले?’’ ते म्हणाले, “शिर्डीत असताना तुझे मन अशांत होते. ते शांत करण्यासाठीच मी तुला येथे पाठविले आहे. मनशांतीशिवाय आत्मसुख लाभत नाही.’’ ते ऐकून मानकरांना मोठे समाधान वाटले. पुढील काळात श्रीबाबांच्या कृपाप्रसादाने मानकरांना आत्मसाक्षात्कार झाला.

अशा प्रकारे श्रीबाबांच्या मार्गदर्शनानुसार आपली साधना पूर्ण करून ते मच्छिंद्रगडावरून वांद्र्याला जाण्यास निघाले. पुणे स्टेशनवर येताच ते तिकीट खिडकीपाशी गेले. तेवढ्यात एक कुणबी मनुष्य त्याच्यापाशी आला व म्हणाला, “तुम्ही कोठे निघाला आहात?’’ मानकरांनी ते दादरला जाणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “मीही दादरलाच निघालो होतो, पण महत्त्वाचे काम आठवल्यामुळे माझे जाणे रद्द झाले आहे. तरी माझ्या तिकीटावर तुम्ही प्रवास करा.’’ बोलता बोलता त्याने ते तिकीट मानकारांच्या हातावर ठेवले आणि तो गर्दीत दिसेनासा झाला. तिकीटाचे पैसे देण्यासाठी त्यांनी त्याला खूप शोधले; परंतु तो दिसलाच नाही. बाबांचे गडावर होणारे दर्शन आणि त्यांनी पुणे स्टेशनवर कुणब्याच्या रूपात येऊन दिलेले तिकीट या घटना मानकर कधीही विसरले नाही.

मानकारांना सतत बाबांचाच ओढा होता. त्यामुळे वांद्रयाला येऊनही त्यांचे मन रमेना. ते पुन्हा शिर्डीतच येऊन राहिले. कालांतराने त्यांनीही श्रीबाबांच्या चरणी देह ठेवला व साईभक्त म्हणून जगप्रसिद्ध झाले.

सहज बोलणे सहज उपदेश ।
ऐसे वर्तन होते खास ।।१।।
काया मानवी तरी प्रत्यक्ष ।
परमेश्वर ते जाणावे।।२।।
श्रीसाईंच्या लीला अनंत।
अगाध आणि अति अद्भुत।।३।।
श्रवण पठणे मोद अत्यंत।
अवघा गोड विस्तार ।।४।।
कृपासिद्ध ते महासंत।
अवतार लोकोपकारार्थ।।५।।
कित्येक वर्षे अविरत ।
भक्तकार्य चालविले ।।६।।
कित्येकांसी उपदेशिले ।
कित्येकांसी संकटी रक्षिले।।७।।
कित्येकांसी अभय दिधले।
केले सुखी भक्तजनां ।।८।।
दुःखितांचे अश्रू पुसले।
व्याधिग्रस्तां बरे केले।।९।।
अनेकांसी सन्मार्गी लावले।
उद्धरिले कित्येकां।।१०।।
केवळ उपकारास्तव जन्म।
केले अव्याहत जनकल्याण।।११।।
साई सर्वांची ‘आई’ होऊन।
राहिले शिर्डी ग्रामात ।।१२।।
श्रीसाईंचे वास्तव्य म्हणून ।
क्षेत्र जाहले परमपावन।।१३।।
एक सिद्धपीठ म्हणून।
प्रसिद्ध भारत वर्षात।।१४।।

विलास खानोलकर
vilaskhanolkardo@gmail.com

Recent Posts

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

3 minutes ago

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता… पाकिस्तानला धडकी!

पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…

11 minutes ago

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…

21 minutes ago

Saifullah Khalid : पहेलगाम हल्ल्यामागील मास्टरमाइंड सैफुल्लाह खालीद नक्की कोण आहे?

जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…

22 minutes ago

Pahalgam Attack Impact: पहलगाम हल्ल्याचा असाही फटका! माता वैष्णवदेवीच्या भाविकांची संख्या घटली

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…

22 minutes ago

Pahalgam Terror Attack : पुन्हा एकदा दहशतीचा अंधार!

काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच…

33 minutes ago