लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पादुकांचे ‘निरा’ स्नान

पुणे (वार्ताहर) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने मंगळवारी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये रात्री प्रवेश केला आहे. वाल्हे गावी मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पालखीने सकाळीच लोणंदच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मंगळवारी निरामधील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात. पादुकांचे निरा नदीच्या पाण्याने स्नान घातले जाते. गेले अनेक वर्ष या स्नानाची परंपरा सुरू आहे.


कोळी समाज त्यांच्या होडीतून पालखी नीरा नदीतून पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देत, तेव्हा इथं पादुकांना स्नान घालण्यात यायचं. तेव्हापासूनच्या या परंपरेत खंड पडू नये म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचे पालन करून ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडण्यात आला. आळंदीतून प्रस्तान होण्याआधी माऊलींच्या पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान घालण्यात आले.


त्यानंतर पादुकांना निरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले आणि आता शेवटी पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नान घालण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे पायवारी सोहळा होऊ शकला नाही. यंदा पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांसोबतच पालखी मार्गावरील लहान गावांमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची