प्रहार    

२०३० पर्यत कचरामुक्तीचे लक्ष्य

  111

मुंबई : मुंबईला जागतिक स्तरावर सर्वात स्वच्छ शहर बनवण्यासाठी पालिका ने 'व्हिजन २०३०' लाँच केले आहे. पुढील ८ वर्षांमध्ये शहरातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी कृती योजना केली आहे. शेकडो कोटी रूपये खर्च करूनही मुंबईतील कचऱ्याची समस्या कधी सुटणार हा एक मोठा प्रश्न आहे? शहरात दररोज ५,५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार, महामंडळाला डंपिंग ग्राऊंडवरील अवलंबित्व कमी करून, स्त्रोतावर कचरा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.


त्यावर कारवाई करत, पालिकेने २०,००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या आणि व्यावसायिक परिसरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्याठिकाणी ५० टक्के बल्क जनरेटर सुविधा आहे. दररोज १०० किलो कचराची या जनरेटरमध्ये विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे. तरीही स्वतःच्या परिसरातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. या करीता शहरातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी नागरीकांनी गेल्या वर्षी ऑनलाइन सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे 'व्हिजन २०३०चा मसुदा तयार करण्यात आला.


व्हिजन २०३०मध्ये विकेंद्रित कचरा व्यवस्थापन, वॉर्ड स्तरावर सुका आणि ओला कचरा वेगळा करणे, डंपिंग ग्राऊंडवरील अवलंबित्व कमी करणे या प्रकाराच्या योजना राबवल्या जाणार आहे. पुढील आठ वर्षात कचऱ्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. घनकचरा विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment
Dadar Kabutar Khana : "कबुतरखाना वाद तापला! जैन समाजाला मराठी एकीकरण समितीची थेट चेतावणी"

Dadar Kabutar Khana : "कबुतरखाना वाद तापला! जैन समाजाला मराठी एकीकरण समितीची थेट चेतावणी"

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या (Dadar Kabutar Khana) प्रकरणावरून सध्या

पोकोचा एम ७ प्लस 5जी भारतात १३ ऑगस्टला होणार लाँच

पोकोचा एम ७ प्लस 5जी भारतात १३ ऑगस्टला होणार लाँच

मुंबई : पोकोकडून एम 7 प्लस 5जी भारतात लॉन्च होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13 ऑगस्ट रोजी

शिवसेना महिला शाखाप्रमुखाला उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

शिवसेना महिला शाखाप्रमुखाला उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई: वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून

मुंबईतील सण उत्सवांसाठी मुंबई पोलीस सज्ज : सणासुदीत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : मुंबईमध्ये सण, उत्सवांचा हंगाम सुरु झाला आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी आणि

एअर इंडिया एक्सप्रेसची ‘फ्रीडम सेल’ घोषणा

मुंबई : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने “फ्रीडम सेल”ची घोषणा करत प्रवाशांना

कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस मूर्तीवर