मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात काल रात्री ११.३० च्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या घटनेत ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ढिगाऱ्याखाली २० ते २५ लोक अडकले असण्याची शक्यता आहे, आतापर्यंत ६ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून ५ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. असे असतानाही त्यात ८ ते १० कुटुंबे राहत होती, सर्व भाडेकरू आहेत, आदित्य ठाकरेंनी लोकांना आवाहन केले आहे की, जेव्हा जेव्हा महापालिका नोटीस देईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…