भुजबळांना कोरोनाची लागण ट्वीट करत दिली माहिती

  89

मुंबई : राज्यात एकीकडे राजकीय सत्तानाट्य दिसत असताना दुसरीकडे राज्यातील मंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट एकापाठोपाठ पॉझिटिव्ह येत आहे. महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ट्वीट करत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.


आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देताना भुजबळ यांनी ट्वीट केले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल, असे ते म्हणाले आहेत.


https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1541399059251924992

त्यांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असं सांगितले आहे. तसेच सर्वांनी कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले आहे.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये