भुजबळांना कोरोनाची लागण ट्वीट करत दिली माहिती

मुंबई : राज्यात एकीकडे राजकीय सत्तानाट्य दिसत असताना दुसरीकडे राज्यातील मंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट एकापाठोपाठ पॉझिटिव्ह येत आहे. महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ट्वीट करत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.


आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देताना भुजबळ यांनी ट्वीट केले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल, असे ते म्हणाले आहेत.


https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1541399059251924992

त्यांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असं सांगितले आहे. तसेच सर्वांनी कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले आहे.

Comments
Add Comment

वेध निवडणुकीचे : धारावीमध्ये फुलणार भाजपचे कमळ

मुंबई(सचिन धानजी) : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही नगरसेवक निवडून

'अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्‍या बांधकामामुळे बाधित होणा-या पात्र रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा'

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे प्रत्‍यक्ष पाहणी दौ-यादरम्‍यान निर्देश मुंबई (खास

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील जैव खाणकामासाठी नवयुग इंजिनिअरींगची निवड

बायोमायनिंग प्रकल्पासाठी तब्बल ३०३५ कोटी रुपये होणार खर्च मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने देवनार

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या