नागपूर (हिं.स.) : मॉईल एक नवरत्न कंपनी असून देशात गरजेपेक्षा कमी मँगनीजचे उत्पादन आहे. मँगनीजच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मॉईलमध्ये काम करणा-या कामगारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मँगनीज ओर इंडिया कंपनीतील कामगार संघटनांच्या स्नेह मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मॉईलचे व्यवस्थापकीय संचालक चौधरी, तानाजी वनवे, योगेश वाडीभस्मे, रामअवतार देवांगन आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना गडकरी पुढे म्हणाले की, विदर्भ, महाराष्ट्र, नागपूरचा विकास व्हावा, युवकांना काम मिळावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा या भावनेतून विकास व्हावा. मॉईल ही एक रत्नांची कंपनी असून या कंपनीच्या प्रगतीचे, विकासाचे श्रेय कामगारांना आहे. आज ८० लाख टन मँगनीजची देशाला गरज आहे. यापैकी ३० लाख टनचे आपले उत्पादन आहे. ५५ लाख टन मँगनीज आपण आयात करतो. ही आयात बंद झाली पाहिजे यासाठी मँगनीजचे उत्पादन वाढवावे यासाठी कामगार संघटनांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मँगनीजचा साठा आज कमी आहे. कारण उत्पादन कमी आहे. जर उत्पादन वाढले तर रोजगार मिळेल. नफा जास्त होईल व कंपनीची प्रगती होईल. यासाठी मँगनीजच्या जास्तीत जास्त खाणी सुरु व्हावा असे सांगताना गडकरी म्हणाले – ११ खाणींजवळ ११ स्मार्ट व्हिलेज तयार व्हावेत. येथे कामगारांना आरोग्य, शैक्षणिक व अन्य सर्व सुविधा मिळाव्या. युनियनच्या नेत्यांनी ट्रेड युनियनचे काम करताना सर्वांचे हित ज्यात आहे, अशा योजना आणाव्या. कामगारांच्या कल्याणाच्या योजनाही आणाव्या. संघटना कोणत्याही झेंड्याखाली काम करोत, पण कामगारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही गडकरींनी केले.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…