मँगनीजच्या उत्पादनवाढीत कामगारांची भूमिका महत्त्वाची - गडकरी

  107

नागपूर (हिं.स.) : मॉईल एक नवरत्न कंपनी असून देशात गरजेपेक्षा कमी मँगनीजचे उत्पादन आहे. मँगनीजच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मॉईलमध्ये काम करणा-या कामगारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मँगनीज ओर इंडिया कंपनीतील कामगार संघटनांच्या स्नेह मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मॉईलचे व्यवस्थापकीय संचालक चौधरी, तानाजी वनवे, योगेश वाडीभस्मे, रामअवतार देवांगन आदी उपस्थित होते.


या कार्यक्रमात बोलताना गडकरी पुढे म्हणाले की, विदर्भ, महाराष्ट्र, नागपूरचा विकास व्हावा, युवकांना काम मिळावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा या भावनेतून विकास व्हावा. मॉईल ही एक रत्नांची कंपनी असून या कंपनीच्या प्रगतीचे, विकासाचे श्रेय कामगारांना आहे. आज ८० लाख टन मँगनीजची देशाला गरज आहे. यापैकी ३० लाख टनचे आपले उत्पादन आहे. ५५ लाख टन मँगनीज आपण आयात करतो. ही आयात बंद झाली पाहिजे यासाठी मँगनीजचे उत्पादन वाढवावे यासाठी कामगार संघटनांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


मँगनीजचा साठा आज कमी आहे. कारण उत्पादन कमी आहे. जर उत्पादन वाढले तर रोजगार मिळेल. नफा जास्त होईल व कंपनीची प्रगती होईल. यासाठी मँगनीजच्या जास्तीत जास्त खाणी सुरु व्हावा असे सांगताना गडकरी म्हणाले - ११ खाणींजवळ ११ स्मार्ट व्हिलेज तयार व्हावेत. येथे कामगारांना आरोग्य, शैक्षणिक व अन्य सर्व सुविधा मिळाव्या. युनियनच्या नेत्यांनी ट्रेड युनियनचे काम करताना सर्वांचे हित ज्यात आहे, अशा योजना आणाव्या. कामगारांच्या कल्याणाच्या योजनाही आणाव्या. संघटना कोणत्याही झेंड्याखाली काम करोत, पण कामगारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही गडकरींनी केले.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती