गुजरात एटीएसने तिस्ता सेटलवाडला घेतले ताब्यात

मुंबई (हिं.स.) : गुजरातमधील २००२ च्या दंगलीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी गुजरात एटीएसच्या दोन पथकांनी तिस्ता सेटलवाडला मुंबईहून ताब्यात घेतले आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून एटीएसचे पथक सेटलवाडला चौकशीसाठी अहमदाबादला घेऊन जाणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी झाकिया जाफरीची याचिका फेटाळून लावताना तिस्ता सेटलवाडच्या एनजीओची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एटीएसने ही कारवाई केली आहे. त्याचवेळी, शनिवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनीही तीस्ता सेटलवाडच्यासह अनेक राजकारण्यांवर नरेंद्र मोदींची बदनामी केल्याचा आरोप केला. गुजरात एटीएसने तीस्ता सेटलवाडच्या विरोधात मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये आयपीसीच्या कलम ४६८ आणि ४७१ अंतर्गत खोटारडेपणाचा आरोप करण्यात आला आहे.


एटीएस अधिकारी जस्मिन रोजिया यांनी सांगितले की, तीस्ता सेटलवाडला सांताक्रूझ पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहमदाबाद शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येईल. एटीएस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सेटलवाडला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, फक्त ताब्यात घेण्यात आले आहे.


गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ६२ राजकारणी आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या क्लीन चिटविरोधात झाकिया जाफरीनी याचिका दाखल केली होती. जी कायद्याचा गैरवापर करणे योग्य नाही असे म्हणत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीच्या तपासाचे कौतुक करत कायद्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी घणाघाती टीका केली. सुप्रीम कोर्टाने तीस्ता सेटलवाडचेही नाव घेत विरोधात आणखी चौकशीची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर सेटलवाडला शनिवारी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या