महाविकास आघाडीने अल्पमतात; सत्तेवर राहण्याचा अधिकार गमावला

...तर एकनाथ शिंदेंना आरपीआयचे लोक देतील साथ


मुंबई (प्रतिनिधी) : ‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ आमदार असल्याने महाविकास आघाडी सरकार आता अल्पमतात आले असून त्यांना सत्तेवर राहण्याचा आधीकार नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेंव्हा महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे सिद्ध होईल’, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केले.


शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भाजप सोबत युती करावी, या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बहुसंख्य आमदार एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी ‘राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर भाजपची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असून सरकार स्थापन करण्याची आपल्याला घाई नाही. शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे. याबाबत आपण कोणतीही घाई करणार नाही’, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले असल्याची माहिती आठवले यांनी दिली.


‘एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची महाविकास आघाडीची खेळी हा या अमदारांवर अन्याय ठरेल. तसेच या अमदारांवरील निलंबन कारवाई असंविधानिक ठरेल. अशी चुकीची व घटनाविरोधी कृती महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार मुंबईत आल्यावर ते आपला मताचा अधिकार बाजावतील. मात्र त्यांच्यावर कोणी दादागिरी करू नये. दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांवर आणि कार्यालयांवर हल्ला करण्याची दादागिरीची, चुकीची भूमिका कोणी घेतली तर आरपीआयचे लोक एकनाथ शिंदे यांना संरक्षण देतील. त्यांना साथ देतील, अशी ग्वाही यावेळी रामदास आठवले यांनी दिली.

Comments
Add Comment

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि