महाविकास आघाडीने अल्पमतात; सत्तेवर राहण्याचा अधिकार गमावला

...तर एकनाथ शिंदेंना आरपीआयचे लोक देतील साथ


मुंबई (प्रतिनिधी) : ‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ आमदार असल्याने महाविकास आघाडी सरकार आता अल्पमतात आले असून त्यांना सत्तेवर राहण्याचा आधीकार नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेंव्हा महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे सिद्ध होईल’, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केले.


शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भाजप सोबत युती करावी, या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बहुसंख्य आमदार एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी ‘राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर भाजपची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असून सरकार स्थापन करण्याची आपल्याला घाई नाही. शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे. याबाबत आपण कोणतीही घाई करणार नाही’, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले असल्याची माहिती आठवले यांनी दिली.


‘एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची महाविकास आघाडीची खेळी हा या अमदारांवर अन्याय ठरेल. तसेच या अमदारांवरील निलंबन कारवाई असंविधानिक ठरेल. अशी चुकीची व घटनाविरोधी कृती महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार मुंबईत आल्यावर ते आपला मताचा अधिकार बाजावतील. मात्र त्यांच्यावर कोणी दादागिरी करू नये. दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांवर आणि कार्यालयांवर हल्ला करण्याची दादागिरीची, चुकीची भूमिका कोणी घेतली तर आरपीआयचे लोक एकनाथ शिंदे यांना संरक्षण देतील. त्यांना साथ देतील, अशी ग्वाही यावेळी रामदास आठवले यांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबईतील हरित क्षेत्रे, उद्यानांवर आता बुधवारी राणीबागेत होणार चर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या

गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने झाले जागे, गॅसच्या सुरक्षित वापरासाठी घेतला 'असा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता

महापालिकेच्या प्रत्येक तक्रारींचे आता त्वरीत निवारण...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारची तक्रार केल्यानंतर त्याला प्रतिसाद

मराठा आरक्षणाचा पेच उच्च न्यायालयात! ओबीसी कोट्यातील अध्यादेशावर आता कोर्टाची नजर

मुंबई: मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातून आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम, राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई  खास प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी