महाविकास आघाडीने अल्पमतात; सत्तेवर राहण्याचा अधिकार गमावला

...तर एकनाथ शिंदेंना आरपीआयचे लोक देतील साथ


मुंबई (प्रतिनिधी) : ‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ आमदार असल्याने महाविकास आघाडी सरकार आता अल्पमतात आले असून त्यांना सत्तेवर राहण्याचा आधीकार नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेंव्हा महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे सिद्ध होईल’, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केले.


शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भाजप सोबत युती करावी, या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बहुसंख्य आमदार एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी ‘राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर भाजपची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असून सरकार स्थापन करण्याची आपल्याला घाई नाही. शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे. याबाबत आपण कोणतीही घाई करणार नाही’, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले असल्याची माहिती आठवले यांनी दिली.


‘एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची महाविकास आघाडीची खेळी हा या अमदारांवर अन्याय ठरेल. तसेच या अमदारांवरील निलंबन कारवाई असंविधानिक ठरेल. अशी चुकीची व घटनाविरोधी कृती महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार मुंबईत आल्यावर ते आपला मताचा अधिकार बाजावतील. मात्र त्यांच्यावर कोणी दादागिरी करू नये. दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांवर आणि कार्यालयांवर हल्ला करण्याची दादागिरीची, चुकीची भूमिका कोणी घेतली तर आरपीआयचे लोक एकनाथ शिंदे यांना संरक्षण देतील. त्यांना साथ देतील, अशी ग्वाही यावेळी रामदास आठवले यांनी दिली.

Comments
Add Comment

Mumbai ATS Raid : दहशतवादी संघटनांशी संबंध, मुंबईत अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक

मुंबई : दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २१

अनिल अंबानी आणि रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित अनेक कंपन्यांवर ईडीचे छापे

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या समूहाची कंपनी असलेल्या रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या मनी लाँड्रिंग चौकशीचा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दुपारी दोन वाजता सादर होणार

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज

जाणून घ्या आजच्या संकष्टी चतुर्थीची वेळ, शुभमुहूर्त आणि व्रत करण्याचे फायदे

मुंबई : हिंदू कालगणनेत संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते. त्या महिन्यांनुसार संकष्टीचे महत्वही वेगळे

स्थायी समितीतील ‘अंडरस्टँडिंग’ला पूर्णविराम; भाजपची सत्ता येताच यापूर्वीच्या भ्रष्टाचाराला आमंत्रण देणाऱ्या अनिष्ठ प्रथा करणार बंद

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत (स्टॅंडिंग कमिटी) यापुढे कोणतेही ‘अंडरस्टँडिंग’ खपवून घेतले जाणार

MHADA App: म्हाडाच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ; आता सर्व सेवा फक्त एका क्लिकवर

मुंबई: सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र अधिकारिणीने (म्हाडा) आता